Saturday, December 10, 2011

उबदार अभ्यंग -2


डॉ. श्री बालाजी तांबे
आपल्याला ऊब ही हवीच असते. उबेचे महत्त्व समजल्यामुळे मनुष्य दोन पायांवर उभा राहिला व त्याने आपला मेरुदंड पृथ्वीच्या काटकोनात आणून ठेवला. उठून बसल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते, रक्‍तप्रवाह मेंदूकडे जाऊ लागतो व त्यातूनच ध्यानासाठी, योगासने करण्यासाठी, शरीरस्वास्थ्य, आत्म्याचे स्वास्थ्य, आत्म्याचे कल्याण ह्यासाठी पद्मासनात ताठ बसावे हा शोध लागला. मात्र, थंडीच्या दिवसात उबदार रजई पांघरून घेऊन झोपणे कल्याणकारक असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्तम तेलाचा अभ्यंग हा खरा थंडीवरचा उपचार.
उबेचे माहात्म्य आपण सर्वांनी जाणून घेतलेले आहे व त्यामुळे लहान मुले आईच्या कुशीत येऊन का झोपतात ह्याचा बरोबर उलगडा होऊ शकतो. शरीरात पायापर्यंत रक्‍तप्रवाह पोचला नाही, काही कारणांनी पायामध्ये पाणी राहून पाय जड झाला, थंड पडला किंवा डोक्‍याला वारा लागल्यामुळे डोके थंड झाले, तर चोळल्याने म्हणजे घर्षणाने ऊब मिळते. छाती व छातीच्या आसपासचा भाग नेहमी गरम राहतो, कारण हृदय सतत धडकत असते. त्याचे आकुंचन-प्रसरण सतत चालू असल्यामुळे मिठी मारताना, कुशीत येताना छातीजवळ डोके वा शरीर येण्याने ऊब चांगली मिळते, हा सर्वांच्याच अनुभवाचा विषय असतो.

एक गोष्ट नक्की, की आपल्याला ऊब ही हवीच असते. परंतु अति ऊब वा अति अग्नी त्रासदायक ठरू शकतो. पृथ्वीचे तापमान वाढते आहे व त्यामुळे वातावरणात बदल होत आहेत. वृक्ष, वनराई, नद्या, पर्वत, बर्फाच्छादित शिखरे यात होणाऱ्या बदलांमुळे पृथ्वीवर अनर्थ ओढवेल की काय, अशी शंकेची पाल मनात चुकचुकलेली आहे. योग्य प्रमाणात अग्नी म्हणजे ऊब. शरीर गरम झाले, की तापावर औषध द्यावे लागते. ज्याचे शरीर जास्त प्रमाणात उष्ण राहते, त्याला थकवा लवकर येतो, अर्थात त्या प्रमाणात त्याचे आयुष्यही कमी होते.

तेव्हा एका बाजूने उष्णता-ऊब आवश्‍यक असते, तर दुसऱ्या बाजूने अति उष्णता कामाची नसते. थंडी वाजल्यावर एखादा मनुष्य थोडे चालून आला किंवा जागच्या जागी पळाला, तर त्याला बरे वाटते. परंतु तो खूप पळाला, तर दमून जाणे, पाय दुखणे वगैरे त्रास होऊ शकतात. मनुष्येतर प्राणिमात्रांचा मेरुदंड जमिनीला समांतर असतो, परंतु उबेचे महत्त्व समजल्यामुळे मनुष्य दोन पायांवर उभा राहिला व त्याने आपला मेरुदंड पृथ्वीच्या काटकोनात आणून ठेवला. हे गणित लक्षात घेतले तर उठून बसले, की थंडी कमी का होते हे लक्षात येईल. पळाल्यानंतर थंडी खूप कमी होईल हे वेगळे, पण उठून बसल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते, रक्‍तप्रवाह मेंदूकडे जाऊ लागतो व त्यातूनच ध्यानासाठी, योगासने करण्यासाठी, शरीरस्वास्थ्य, आत्म्याचे स्वास्थ्य, आत्म्याचे कल्याण ह्यासाठी पद्मासनात ताठ बसावे हा शोध लागला. बरे वाटावे, उत्साह यावा यासाठी बसणे किंवा उभे राहणे आवश्‍यक असते. तसेच 24 तासातील निदान सहा - सात तास आडवे राहिले नाही, तर मनुष्य उष्णतेमुळे थकून जातो. म्हणून थंडी वाजते आहे ह्या कारणासाठी झोपायचेच नाही असे ठरवून चालत नाही.

थंडीच्या दिवसात, मग ती गुलाबी थंडी असो, कडकडीत थंडी असो,छान पैकी उबदार रजई पांघरून घेऊन झोपणे कल्याणकारक असते.
जमिनीवर मांडी घालून ताठ बसणे किंवा ऊबदार रजई घेऊन झोपणे हा झाला तात्पुरता इलाज. परंतु थंडीपासून खरे संरक्षण केवळ कुडकुडणे थांबवून मिळू शकत नाही. उत्तम तेलाचा अभ्यंग हा खरा थंडीवरचा उपचार. आपण दीपावलीच्या वेळी अंगाला तेल-उटणे लावून ओवाळतो, ते येणाऱ्या थंडीत अभ्यंग आवश्‍यक करावा लागेल हे लक्षात ठेवण्यासाठी. अभ्यंग करत असताना खोलीत खूप थंड वातावरण नसावे. अभ्यंगाच्या वेळी बाहेर खूप थंडी असेल तर खोलीत शेगडी पेटवून ठेवावी

No comments:

Post a Comment

ad