Friday, February 5, 2010

अन्नयोग : दूध 2

जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये बाळाचा विकास सर्वस्वी दुधावरच होत असतो. अर्थातच आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम असते.
दुधाला पूर्णान्न समजले जाते, कारण जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये बाळाचा विकास सर्वस्वी दुधावरच होत असतो. अर्थातच आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम असते. काही कारणास्तव आईचे दूध न मिळाल्यास गाईचे वा बकरीचे दूध बाळाला देता येते.
आयुर्वेदात आठ प्राण्यांच्या दुधाचे स्वतंत्र गुण सांगितले आहेत. मागच्या वेळेला आपण गाय, म्हैस, बकरी व उंटिणीच्या दुधाचे गुणधर्म पाहिले, आता घोडी वगैरे इतर प्राण्यांच्या दुधाचे गुणधर्म आपण पाहू.

घोडी वगैरे एक खूर असणाऱ्या प्राण्यांचे दूध
बल्यं स्थैर्यकरं सर्वमुष्णं चैकशफं पयः । साम्लं सलवणं रुक्षं शाखावातहरं लघु ।।...चरक सूत्रस्थान
* चव - आंबट व किंचित खारट
* गुण - रुक्ष, लघु म्हणजे पचायला सोपे
* वीर्य - उष्ण
एक खूर असणाऱ्या प्राण्यांचे दूध बलवर्धक, शरीराला स्थिरता देणारे व हाता-पायातील वातदोष दूर करणारे असते.

मेंढीचे दूध
हिक्काश्‍वासकरं तूष्णं पित्तश्‍लेष्मलमाविकम्‌ ।...चरक सूत्रस्थान
* वीर्य - उष्ण
* दोष - पित्त व कफवर्धक
मेंढीचे दूध उचकी व दमा उत्पन्न करणारे व अतिशय गरम असते. मेंढीच्या दुधाला एक प्रकारचा दुर्गंध येतो, त्यामुळे मेंढीचे दूध सहसा प्यायले जात नाही. शिवाय ते उष्ण असल्यानेही नियमित घेणे अयोग्य होय.

हत्तिणीचे दूध हस्तिनीनां पयो बल्यं गुरु स्थैर्यकरं परम्‌ ।...चरक सूत्रस्थान
हत्तिणीचे दूध बलदायक व शरीराला स्थिर करणारे असते मात्र पचण्यास अवघड असते.

स्त्रीचे दूध
जीवनं बृंहणं सात्म्यं स्नेहनं मानुषः पयः । नावनं रक्‍तपित्ते च तर्पणं चाक्षिशूलिनाम्‌ ।।...चरक सूत्रस्थान
स्त्रीचे दूध अर्थात स्तन्य नवजात बालकासाठी जीवनदायक असते, सर्व धातूपोषक असते, अनुकूल असते व शरीराला उचित स्निग्धता देते. नाकातून रक्‍त येत असल्यास नाकात घालण्यासाठी आणि डोळे दुखत असल्यास डोळ्यात घालण्यासाठी स्तन्य वापरता येते.

दहीदही तयार करण्यासाठी गाईचे वा म्हशीचे दूध वापरले जाते. दूध तापवून त्याला विरजण लावले की त्याचे दही तयार होते. दुधाला लावायचे विरजण पारंपरिक, हजारो वर्षांपासून चालत आलेले व प्राणिज असायला हवे. लिंबाची वाळवलेली साल दुधात टाकूनही दही तयार होते पण अशा वनस्पतिज विरजणाने तयार झालेले दही खरे दही नव्हे. पारंपरिक, प्राणिज विरजण लावल्यानंतर त्याचे नीट दही लागायला पुरेसा वेळ द्यावा लागतो. रात्री उशिरा विरजण लावले व सकाळी लवकर दही तयार झाले असे समजणे योग्य नाही. विरजण लावल्यावर त्याचे नीट दही होण्यासाठी 10-11 तास द्यावे लागतात. दूध व्यवस्थित व पूर्णपणे विरजण्यासाठी किंवा दुधाचे संपूर्णपणे दह्यात परिवर्तन होण्यासाठी त्यावर सूर्याच्या प्रकाशाचा थोडा संस्कार होणे आवश्‍यक असते. थंडीच्या दिवसात दही जमायला थोडा अधिक वेळ लागतो. उन्हाळ्यात त्या मानाने दही लवकर लागते.
या प्रकारे योग्य विरजण, पुरेसा वेळ या गोष्टी सांभाळून जे दही लागते ते पुरेसे पाणी टाकून रवीने नीट घुसळले व त्यातून लोणी बाजूला काढले की जे ताक तयार होते ते खरे ताक. मुळात जर दहीच योग्यप्रकारे तयार केलेले नसेल तर त्यातून तयार होणारे ताक, लोणी, तूप वगैरे योग्य नसतील.
संपूर्ण जगभर दही खाण्याची पद्धत दिसते पण दह्याचे गुणधर्म पाहून ते आपल्या प्रकृतीला अनुकूल आहे वा नाही हे पाहणे आवश्‍यक होय.
रोचनं दीपनं वृष्यं स्नेहनं बलवर्धनम्‌ ।पाकेऽम्लमुष्णं वातघ्नं मल्यं बृंहणं दधि ।।...चरक सूत्रस्थान

* रस -मधुर, आंबट किंचित तुरट
* गुण - गुरु म्हणजे पचण्यास जड, स्निग्ध
* वीर्य - उष्ण
* विपाक - आंबट
* दोष - वातनाशक पण पित्त-कफवर्धक

दही चवीला रुचकर असते, योग्य प्रमाणात सेवन केले असता ताकद वाढवते, शरीराला स्निग्धता देते तसेच अग्नी प्रदीप्त करते, पण दह्यामुळे शरीरातील स्रावांचे प्रमाण वाढते.

दह्यामुळे अंगावर सूज येऊ शकते, सर्दी-खोकला होऊ शकतो, चरबी वाढू शकते. म्हणून दही नियमितपणे खाणे योग्य नसते. वजन जास्ती असणाऱ्यांनी, त्वचारोग असणाऱ्यांनी, सर्दी-खोकला होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी, यकृत-वृक्क या अवयवांची कार्यक्षमता कमी झालेली असणाऱ्यांनी, उष्ण प्रकृती असणाऱ्यांनी दही नियमित वा वारंवार खाणे टाळणे उत्तम होय.
सूर्यास्तानंतर दही नुसते खाऊ नये तर मुगाचे कढण, मध, तूप, खडीसाखर, आवळकाठी, सैंधव यापैकी एका पदार्थासह खावे असेही संदर्भ आहेत. एकंदर पाहता दही खूपच काळजीपूर्वक खायला हवे. आंबट व शिळे दही खाणे निश्‍चितपणे टाळावे कारण अशा दह्याने रक्‍तदोष तयार होतो. परिणामतः त्वचारोग, तोंड येणे, पाळीच्या वेळेला अतिरक्‍तस्राव होणे, शरीराला दुर्गंधी येणे यासारखे अनेक त्रास होऊ शकतात. अदमुरे म्हणजे विरजण लावल्यानंतर चार - पाच तासात बनलेले, नीट न लागलेले दही. अदमुऱ्या दह्याने त्रिदोषांचा प्रकोप होतो, म्हणून असे दही खाणे अयोग्य होय. नीट लागलेल्या दह्याचे पाणी मात्र औषधी असते. शरीरातील सर्व स्रोतसांची शुद्धी करण्याचा गुण दह्याच्या पाण्यात असतो. म्हणूनच अनेक औषधी तेला-तुपावर दह्याच्या पाण्याचा संस्कार केलेला असतो.

- डॉ. श्री बालाजी तांबे Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

टोमॅटोपासून बनवलीय सुरकुत्यांना रोखणारी गोळी

आजच्या आधुनिक जगात तुम्ही किती हुशार आहात याच्याइतकेच तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे यालाही महत्त्व आहे. सर्वानाच देव सगळे काही भरभरून देतो असे नाही, त्यामुळेच अनेक स्त्री-पुरुष सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे क्रीम, लोशन, औषधे, मसाज यांचा वापर करीत असतात. यातील दावे कितपत खरे असतात हे सांगणे तसे अवघड आहे. पण आपला चेहरा छान दिसावा, निदान तो सर्वाना आवडावा यासाठी प्रत्येकजण या मार्गाचा अवलंब करीत असतो. चेहऱ्यावर जर सुरकुत्या असतील तर तुमची वृद्धत्वाची प्रक्रिया सुरू झाल्याचे ते निदर्शक असते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी अनेकजण गाढवाच्या दुधापासून ते इंजेक्शनपर्यंत सर्व उपाय करतात. अशा वेगवेगळ्या उपायांनी त्वचेला अपायही होऊ शकतो. म्हणून कुठलेही उपाय हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केलेले बरे. अलीकडेच एक गोळी तयार करण्यात आली असून, त्यात चेहऱ्याची त्वचा अधिक सुकोमल व तजेलदार दिसण्यासाठी ती प्रभावी आहे. इनेव्ह फर्मेट हे त्या लाल रंगाच्या गोळीचे नाव आहे. ती रोज घेतल्यास सुरकुत्या येण्याची प्रक्रियाच रोखली जाते, असा संशोधकांचा दावा आहे. या गोळीत टोमॅटोमध्ये आढळणारे लायकोपिन हे द्रव्य असते. त्यामुळे जुन्या त्वचापेशींचे संरक्षण होते. त्याचबरोबर नवीन पेशींची वाढ होते. वेगवेगळ्या वयोगटातील ९० महिलांवर या गोळीचे प्रयोग करण्यात आले. त्यातील काहींना ही गोळी, तर काहींना प्लासेबो (म्हणजे औषध नसलेली गोळी) देण्यात आली. ज्यांनी ही सुरकुत्या प्रतिबंधक गोळी सहा महिने घेतली होती त्या महिलांमध्ये त्वचेची लवचिकता चांगलीच म्हणजे ८.७ टक्के दिसून आली. ज्यांनी प्लासेबो घेतले होते त्यांच्यात काहीही परिणाम दिसला नाही. इनेव्ह फर्मेट ही गोळी एल ओरियल या सौंदर्यप्रसाधन कंपनी व नेसले यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आली आहे. शरीरपोषण विज्ञान व त्वचाविज्ञान यातील तंत्रांचा वापर करून ती तयार केली आहे. ही गोळी म्हणजे केवळ वरवरचा उपाय नाही तर शरीरातून दिले जाणारे ते औषध आहे. त्यामुळे त्याला कॉस्मेसेटय़ुकल्स असे म्हणतात. जीवनसत्त्वाच्या गोळीसारखे पूरक औषध म्हणून ती गोळी लोकप्रिय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. युरोप व दक्षिण अमेरिकेत ही गोळी अगोदरच वापरात आहे व आता ती इंग्लंडमध्येही विक्रीस येत आहे. या दहा गोळ्यांची किंमत २५ पौंड आहे, त्यामुळे ती अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. इनेव्हच्या पॅट्रिशिया मॅनिसियर यांच्या मते ही गोळी तयार करताना बरेच संशोधन करण्यात आले आहे व अजूनही त्यात सुधारणा होत आहेत. शरीराला उत्तम पोषण मिळाले तर त्वचा कोमल व तुकतुकीत राहू शकते. या गोळीचे जे तीन घटक आहेत ते अँटिऑक्सिडंट असून, त्यात उतींचा ऱ्हास रोखण्याची क्षमता आहे. लायकोपिन हे टोमॅटोत आढळणारे द्रव्य घेऊन ते मानवी पेशीत शोषले जाईल अशा स्वरूपात आणले आहे. त्याला सी जीवनसत्त्व व आयोसोफ्लॅव्होन्सची जोड आहे. यातील आयोसोफ्लॅव्होन्स हे सोयाबीनमधून घेतले आहे. आर्थिक मंदी असली तरी लोकांची सौंदर्यदृष्टी कायम असून, त्यावर ब्रिटनमध्ये वर्षांला ७०० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त खर्च होत आहे. ग्लासगो येथील सौंदर्य उपचारतज्ज्ञ केरिन बोंग यांनी सांगितले की, या गोळीचे परिणाम चांगले आहेत यात शंका नाही, पण ज्यांच्यावर प्रयोग करण्यात आला त्यांची संख्या कमी आहे.
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Thursday, February 4, 2010

वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स

आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसा आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत. 

१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.

२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.

३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्� �� घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.

४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.

५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.

६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.

७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.

८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.

९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.

१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्� �ा दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.

११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.

१२) जास्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.

१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.

१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.

१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपान� � मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.

१६) कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.

१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी प िळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.
Dr. Santosh Jalukar
Phone: 9969106404
santoshjalukar@rediffmail.com
 
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

---

Search Matrimonial Profiles at Matrimonialsindia.Com
Matrimonial