Showing posts with label कंबरदुखी. Show all posts
Showing posts with label कंबरदुखी. Show all posts

Wednesday, March 19, 2014

पाठदुखी

पाठदुखी हे एक लक्षण आहे, शरीरातल्या बिघाडाचे सूचक चिन्ह आहे. हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. अर्थातच पाठदुखीवर फक्‍त वेदना कमी करणे इतका मर्यादित स्वरूपाचा उपचार करणे अयोग्य ठरते, तर नेमके कारण काय आहे हे शोधून त्यानुसार नेमके उपचार करणे आवश्‍यक असते.

पाठदुखी व कंबरदुखीचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो, दुखण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी पाठदुखी सर्वांना माहिती असते. तसे पाहिले तर पाठदुखी हे एक लक्षण आहे, शरीरातल्या बिघाडाचे सूचक चिन्ह आहे. हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. अर्थातच पाठदुखीवर फक्‍त वेदना कमी करणे इतका मर्यादित स्वरूपाचा उपचार करणे अयोग्य ठरते, तर नेमके कारण काय आहे हे शोधून त्यानुसार नेमके उपचार करणे आवश्‍यक असते.

पाठीचा कणा हा संपूर्ण शरीराचा भरभक्कम आधार असतो. वाकणे, उठणे, बसणे, वळणे, चालणे अशा बहुतेक सर्वच क्रिया करताना आपण पाठीच्या कण्याचा वापर करत असतो. मानेमध्ये सात, छातीच्या मागच्या भागामध्ये बारा, कंबरेमध्ये पाच मणके असतात, माकडहाडाचे पाच मणके एकमेकांशी सांधलेल्या स्थितीत असतात व त्याच्याही खाली तीन ते पाच मणके जुळलेल्या स्थितीत असणारा कॉसिक्‍स म्हणून कण्याचा शेवटचा भाग असतो. अशा प्रकारे कवटीपासून ते बैठकीच्या भागापर्यंत हे सर्व मणके एकावर एक रचलेल्या स्थितीत असतात. दोन मणक्‍यांमध्ये जणू रबरापासून बनविल्यासारखी चकती असते, जिला "डिस्क (गादी)' असे म्हटले जाते. या मधल्या चकतीमुळेच कणा वाकू शकतो, वळू शकतो. या शिवाय या सर्व मणक्‍यांना व चकत्यांना धरून ठेवणारे अनेक संधिबंधने, स्नायू असतात. या कण्यामध्ये मज्जारज्जूचे स्थान असते. अतिशय महत्त्वाच्या व नाजूक मज्जारज्जूला पाठीचा कणा चहूबाजूंनी सुरक्षित ठेवण्याचे काम करत असतो.

पाठदुखीचे कारण
पाठदुखी असे म्हटले जाते तेव्हा हे दुखणे पाठीच्या कोणत्याही भागात उद्भवलेले असू शकते, तसेच पाठीच्या कण्यातील कुठल्याही संरचनेतील बिघाडाशी संबंधित असू शकते. उदा. पाठीच्या हाडांमधली ताकद कमी झाली तरी पाठ दुखू शकते. इतर हाडे ठिसूळ होतात त्याप्रमाणे मणके ठिसूळ होऊ लागले तरी पाठ दुखू शकते, कण्याला बांधून ठेवणाऱ्या संधिबंधनांना दुखापत झाली तरी पाठ दुखू शकते, कण्याला आधार देणारे स्नायू जखडू लागले तरी पाठदुखी सुरू होऊ शकते. दोन मणक्‍यांमधल्या चकतीची झीज झाली किंवा काही कारणाने ती स्वस्थानातून थोडी जरी निसटली आणि याचा दाब नसेवर आला तरी तीव्र स्वरूपाची पाठदुखी निर्माण होऊ शकते. याशिवाय स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयातील अशक्‍तता पाठदुखीला कारण ठरू शकते. अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अतिरक्‍तस्राव होणे हेसुद्धा पाठदुखीला आमंत्रण देऊ शकते. स्त्रीप्रजननसंस्थेत कुठेही सूज असली, जंतुसंसर्ग असला तरी त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी उद्भवू शकते. अर्थात अशा वेळी फक्‍त पाठीवर नाही तर आतील दोषावर नेमके उपचार करणे आवश्‍यक असते.

वाढत्या वयानुसारही पाठ-कंबरदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, संगणकावर रोज 10-12 तास काम हीसुद्धा पाठदुखीची कारणे होत. फार मऊ गादीवर झोपणे, उंच उशी वापरणे, स्थौल्य, उंच टाचेच्या चपला वापरणे, जड वस्तू उचलणे, ओढणे हीसुद्धा पाठदुखीला आमंत्रण देणारी असतात.

बिघडलेला वातदोष

आयुर्वेदानुसार विचार केला तर पाठदुखी, कंबरदुखी ही वातदोषातील बिघाडाशी संबंधित तक्रार होय. पाठीतील लवचिकता कमी होणे, उठता-बसताना आधाराची गरज भासणे, पाठ जखडणे, पाठीत चमक भरणे वगैरे सर्व तक्रारी वातदोषाशी संबंधित असतात आणि म्हणूनच सहसा पाठदुखी बरोबरीने वाताची इतर लक्षणेही उदा. गुडघेदुखी, मलावष्टंभ, गॅसेस, त्वचा कोरडी पडणे, अशक्‍तपणा जाणवणे, पाय दुखणे, नेहमीच्या हालचाली करताना सहजपणा न राहणे, सांध्यांमधून कटकट आवाज येणे वगैरे त्रास जाणवू लागतात.

म्हणूनच पाठदुखी, कंबरदुखीवर उपचार करताना वाढलेल्या, बिघडलेल्या वातदोषाला संतुलित करणे, झीज झालेली असल्यास ती भरून काढणे आणि ज्या कारणामुळे पाठदुखी सुरू झाली असेल ते कारण दूर करणे अशा प्रकारे योजना करणे आवश्‍यक असते.

पाठ दुखायला लागली, की विश्रांती घ्यावीशी वाटते हा सर्वांचा अनुभव असतो आणि सहसा यामुळे बरेही वाटते. मात्र, फार तीव्र स्वरूपाची पाठदुखी असेल, अगदी साध्या हालचाली करणेही अवघड होत असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक असते. विशेषतः वेदना पाठीतून सुरू होऊन पायांच्या टोकापर्यंत पोचत असतील, श्‍वासोच्छ्वास करताना त्रास होत असेल, छातीत दुखत असले तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे इष्ट होय; परंतु अशी परिस्थिती येऊ नये यासाठी दक्ष राहणेच इष्ट.

प्रतिबंधात्मक उपाय
संपूर्ण शरीराचा आधार असणाऱ्या पाठीच्या कण्याची सुरवातीपासून काळजी घेतली तर पाठदुखी-कंबरदुखीला प्रतिबंध तर होतोच, पण एकंदर चेतासंस्थेचे आरोग्य व्यवस्थित राहायला मदत मिळते. वातदोष संतुलित राहावा, पाठीच्या कण्यातील हाडे व सांधे तसेच आतील मज्जारज्जू यांचे पोषण व्हावे यादृष्टीने पुढील उपचार करता येतात.

मान व पाठीला तेल लावणे. वाताला संतुलित ठेवण्यासाठी, सांध्यांची लवचिकता कायम ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय होय. स्वतःहून किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी खालून वर या दिशेने पाठीच्या कण्याला तेल उदा. संतुलन कुंडलिनी तेल लावता येते.

नस्य - रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात घरचे साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकणे. विशेषतः हे मानेच्या आरोग्यासाठी उपयुक्‍त असते. तसेच मेरुदंडाला ताकद देण्यासाठी साहायक असते.

रोजच्या रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे. वाताच्या असंतुलनामुळे पोट साफ होत नाही आणि पोट साफ झाले नाही तर त्यामुळे वात अजूनच बिघडतो. अर्थातच या दुष्ट चक्राचा पाठीच्या कण्यावरही दुष्परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे चांगले. आवश्‍यकतेनुसार अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा, सॅनकूलसारखे चूर्ण घेता येते.

आहारात वातशामक, कफपोषक पदार्थांचा समावेश असणे -
किमान चार-पाच चमचे घरचे साजूक तूप रोजच्या आहारात ठेवणे, रोज कपभर ताजे सकस दूध पिणे, दुधात खारकेची एक चमचा पूड टाकणे, बरोबरीने शतावरी कल्प, चैतन्य कल्प घेणे हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे हितकारक ठरते.

मज्जापोषक, अस्थिपोषक पदार्थांचे सेवन करणे -
खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, बदाम, च्यवनप्राश, मॅरोसॅनसारखे रसायन रोज घेणे हे मणके, मेरुदंड अशा दोघांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे - पाठीचा कणा आणि मानसिक ताण यांचा खूप जवळचा संबंध असतो. ताणामुळे कण्याजवळील पेशी कडक झाल्या तर त्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते, पर्यायाने मानेचे व पाठीचे त्रास होण्याची शक्‍यता वाढते. मानसिक ताण आला तरी तो कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, संगीत ऐकणे, ॐकार गुंजन यांसारखे उपाय करता येतात.

पाठीच्या कण्याचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्यासाठी अजून एक उत्तम उपाय म्हणजे नियमित व्यायाम. यामध्ये सर्वप्रथम येते ते चालणे. रोज 30 मिनिटे नियमित चालल्यास पाठीच्या मणक्‍यांची, मणक्‍यांमधील गादीसारख्या डिस्कची लवचिकता नीट राहते, त्यामुळे मान-पाठीचे त्रास कमी होण्यास प्रतिबंध होतो.

याखेरीज ताडासन, अर्धशलभासन, स्कंध चक्र, मार्जारासन, संतुलन क्रियायोगातील स्थैर्य, समर्पण, विस्तारण ही आसनेही मानेच्या-पाठीच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.

मानेचे सोपे व्यायाम, उदा. ताठ बसून मान हलकेच मागे नेणे, पुढे आणणे, डावी-उजवीकडे फिरविणे, खांद्यांच्या बाजूला शक्‍य तेवढी वाकवणे, पुन्हा सरळ करणे या प्रकारचे व्यायाम करता येतात. बैठे काम असणाऱ्यांनी, विशेषतः संगणकावर काम करावे लागणाऱ्यांना तर हे व्यायाम खुर्चीत बसल्या बसल्यासुद्धा करता येतात.

प्राणायाम, दीर्घश्‍वसन किंवा या दोघांचा एकत्रित परिणाम देणारे ॐकार गुंजनसुद्धा पाठीच्या कण्यासाठी उत्कृष्ट उपाय होय. या उपायांनी हवेतील प्राणशक्‍ती अधिक प्रमाणात मिळू शकते व ती मेंदू, मेरुदंड यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्‍यक असते. प्राणशक्‍तीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झाला की वेदना, जखडणे, अवघडणे यांसारख्या तक्रारींना वाव मिळत नाही, उलट रक्‍ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते. रोज किमान 10-15 मिनिटे यासाठी काढली तर पाठीच्या कण्यासंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होऊ शकेल.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Monday, October 24, 2011

वातव्याधीचे निदान - 2


डॉ. श्री बालाजी तांबे
संपूर्ण शरीराला व्यापून असणारा वातदोष शरीरातील प्रत्येक हालचालीचा प्रेरक असतो. वातदोष बिघडला तर शरीरात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी लक्षणे उत्पन्न करू शकतो.

वातदोष शरीरातील प्रत्येक हालचालीचा प्रेरक असतो. अर्थातच, संपूर्ण शरीराला तो व्यापून असतो. जोपर्यंत तो संतुलित असतो, तोपर्यंत आपली कामे व्यवस्थित करत असतो. मात्र, वातदोष बिघडला तर शरीरात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी लक्षणे उत्पन्न करू शकतो. उदा. कोठ्यामध्ये वात बिघडला तर त्यामुळे पुढील त्रास होतात -

- मल-मूत्रप्रवृत्ती होत नाही.
- हृदयरोग होतो.
- पोटात वाताचा गोळा अनुभूत होतो.
- बरगड्या दुखतात.
- मूळव्याधीचा त्रास होतो.

संपूर्ण शरीरात वात प्रकुपित झाला तर, त्यामुळे....
- शरीरात कुठेही फडफडल्यासारखे, स्फुरण पावल्यासारखे अनुभूत होते.
- संपूर्ण शरीरातील हाडे असह्य दुखतात.
- सर्व सांधे दुखतात.

गुदभागी वात बिघडला, तर.....
- मलमूत्रप्रवृत्ती अजिबात होत नाही किंवा व्यवस्थित होत नाही.
- पोटात दुखते, गॅसेस होतात.
- पाय, मांड्या, कंबर, पाठ या ठिकाणी वेदना होतात.
- हे अवयव सुकतात, बारीक होतात.
- मूतखड्याचा त्रास होतो.

आमाशयाच्या (खाल्लेले अन्न सर्वप्रथम साठते तो अवयव) ठिकाणी वात वाढला, तर....
- पोट, बरगड्या, हृदय, नाभीच्या भोवती वेदना होतात.
- खूप तहान लागते, घसा कोरडा पडतो.
- ढेकर येत राहतात.
- खोकला येतो, श्‍वासाची गती वाढते.

कान, नाक, डोळे वगैरे इंद्रियांच्या ठिकाणी वात वाढला तर त्यांची कार्यक्षमता कमी होते किंवा नष्ट होते.
उदा. श्रवणदोष तयार होतो, नाकाने वास येत नाही, डोळ्यांना दिसत नाही.

त्वचेच्या ठिकाणी किंवा रसधातूमध्ये वात बिघडला, तर....
- त्वचा कोरडी होते, फुटते.
- त्वचा निस्तेज होते, काळवंडते, ताणली जाते व पातळ-दुर्बल होते.
- बोटांचे छोटे-छोटे सांधे दुखू लागतात.
- रक्‍तधातूच्या ठिकाणी वाताचा प्रकोप झाला, तर...
- संपूर्ण शरीरात वेदना होतात.
- सर्वांगात दाह होतो.
- शरीराचा वर्ण बिघडतो.
- वजन कमी होते, खावेसे वाटत नाही.
- अनुत्साह प्रतीत होतो.
- शरीरावर पुरळ, फोड वगैरे येतात.

मांस व मेदाच्या ठिकाणी वातदोष वाढला, तर....
- संपूर्ण शरीराला जडपणा येतो, सुया टोचल्यासारखे वाटते.
- खूप थकवा जाणवतो, मार लागल्यावर शरीर ठणकावे त्याप्रमाणे वेदना होतात.

अस्थी व मज्जाधातूच्या ठिकाणी वात वाढला, तर....
- हाडांमध्ये तुटल्याप्रमाणे वेदना होतात.
- लहानमोठे सर्व सांधे फार दुखतात.
- ताकद कमी होते.
- मनुष्य अशक्‍त, बारीक होतो.

शुक्रधातूच्या ठिकाणी वात प्रकुपित झाला, तर -
- वीर्यस्खलन होत राहते किंवा अजिबात होत नाही.
- सहसा गर्भधारणा होत नाही, मात्र झाली तरी गर्भस्राव, गर्भपात होतो किंवा गर्भात विकृती येते.

शिरांमध्ये, रक्‍तवाहिन्यांमध्ये वात वाढला, तर.....
- शिरा संकोच पावतात किंवा शिरांच्या भिंतीतील स्थितिस्थापकत्व कमी होऊन शिरा विस्तारतात, शिथिल होतात.

सांध्यांमध्ये वात प्रकुपित झाला, तर.....
- संधिबंध शिथिल होतात.
- सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही.
- सांध्यांवर सूज येते व तीव्र वेदना होतात.

पुढच्या वेळी आपण अजून वातव्याधींचे प्रकार पाहणार आहोत.                        

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

वातव्याधीचे निदान -1


डॉ. श्री बालाजी तांबे
वात शरीराचे आरोग्य सांभाळत असतो. वातदोषाच्या असंतुलनाने वातव्याधी होतात. वातदोष कोणत्या कारणाने आणि कोणत्या स्थानी उद्‌भवतो, यावर त्याची लक्षणे व रोग ठरतात.

वातदोषाच्या असंतुलनामुळे होणारे व्याधी म्हणजे वातव्याधी. वातव्याधीचे अनेक प्रकार असतात, मात्र या सर्वांचे मूळ कारण बिघडलेल्या वातात असते.

वातव्याधीची कारणे
- कोरड्या आणि थंड पदार्थांचे अतिसेवन करणे.
- फार कमी खाणे.
- मैथुन अतिप्रमाणात करणे.
- रात्री जागरणे करणे.
- नियमांचे पालन न करता अशास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्मादी उपचार करणे.
- कोणत्याही कारणाने शरीरातून अतिप्रमाणात रक्‍तस्राव होणे.
- उड्या, पोहणे, व्यायाम वगैरेंचा अतियोग होणे.
- वेड्यावाकड्या किंवा अति प्रमाणात हालचाली करणे.
- रसादी सप्तधातूंपैकी कोणताही एक किंवा अधिक धातू क्षीण होणे.
- अतिप्रमाणात चिंता वा शोक करणे.
- रोगामुळे वजन कमी होणे.
- मल-मूत्रादी नैसर्गिक वेग धरून ठेवणे.
- शरीरात आमदोष साठणे.
- मार लागणे.
- उपवास करणे.
- हृदय, मेंदू व बस्ती (किडनी व युरिनरी ब्लॅडर) या मर्मस्थानांमध्ये बिघाड होणे.
- हत्ती, घोडा, गाडी, विमान वगैरेंतून वेगाने प्रवास करणे.

या सर्व कारणांमुळे कुपित झालेला वातदोष शरीरातील स्रोतसांचा आश्रय घेतो आणि शरीरात एखाद्या ठिकाणी किंवा संपूर्ण शरीरात अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करतो.

वातव्याधी होण्यापूर्वी शरीरावर दिसणारी लक्षणे -
ज्या प्रकारचा वातव्याधी होणार असेल त्याचीच लक्षणे कमी प्रमाणात दिसू लागतात. उदा. कंपवात हा वातव्याधी होणार असला तर अगोदर लिहिताना हात कापणे, बारीकशी गोष्ट करताना हात थरथरणे अशी लक्षणे दिसू लागतात. ही वातरोगाची सूचक लक्षणे सुद्धा कमी-जास्ती होत राहतात. वाताची तीव्रता कमी झाली की शरीरात हलकेपणा येतो, मात्र वात वाढला तर पुन्हा पूर्वरूपे दिसू लागतात.

वातदोषाच्या असंतुलनामुळे अनेक रोग होऊ शकतात. या रोगांची माहिती आपण घेणार आहोतच, त्यापूर्वी वात-असंतुलनामुळे दिसणारी सामान्य लक्षणे काय असतात हे पाहू या.

संकोचः पर्वणां स्तम्भो भोऽस्थ्नां पर्वणामपि ।
रोमहर्षः प्रलापश्‍च पाणिपृष्ठशिरोग्रहः ।।
खाञ्ज......पुाल्यकुब्जत्वं शोथो।ऽऽनामनिदद्रता ।
गर्भशुक्ररजोनांशः स्पदनं गांत्रसुप्तता ।।
शिरोनासाक्षिजत्रूणां ग्रीवायाश्‍चापि हुण्डनम्‌ ।
स्तोदोऽर्तिराक्षेपो मुहुश्‍चायास एव च ।।...माधवनिदान


- हाता-पायाची बोटे आखडतात, हात बंद-उघड होऊ शकत नाहीत.
- हाडांमध्ये तीव्र वेदना होतात, बोटांमध्ये तीव्र वेदना होतात.
- अंगावर अकारण काटा येतो.
- अकारण बडबड केली जाते.
- पाय, पाठ व डोके आखडते.
- पाठीला कुबड येते.
- मनुष्य चालण्यास असमर्थ होतो.
- अंगावर सूज येते.
- झोप कमी येते.
- गर्भधारणा होण्यास त्रास होतो किंवा झालेली गर्भधारणा टिकत नाही.
- पुरुषांमध्ये पुनरुत्पादनाची शक्‍ती कमी होते.
- स्त्रीमध्ये रजःप्रवृत्ती कमी किंवा अकाली थांबते.
- संपूर्ण शरीरात किंवा शरीराच्या एका भागात कंप होऊ लागतो, तसेच बधिरपणा येतो.
- मान ताठ राहत नाही, डोक्‍यात तीव्र वेदना होतात.
- गंधज्ञानाची क्षमता कमी वा नष्ट होते.
- डोळे बारीक होतात, छाती-मानेतही जखडल्यासारखे वाटते.
- सर्व अंगात वेदना होतात, अस्वस्थता प्रतीत होते.

वातदोषाचे वैशिष्ट्य असे, की तो कारणानुसार आणि स्थानानुसार अनेक लक्षणे, अनेक रोग उत्पन्न करू शकतो. उदा. वातदोष त्वचेच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर त्वचा कोरडी होऊन भेगा पडू शकतात. सांध्यांच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर सांधे आखडू शकतात, नसांच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर बधिरपणा येऊ शकतो वगैरे. याविषयीची अधिक माहिती आपण पुढच्या वेळी पाहणार आहोत.                        

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Wednesday, June 29, 2011

मणके झाले ढिले


डॉ. जयदेव पंचवाघ, चेताविकारतज्ज्ञ, पुणे
श्री. लालजी खंडेलवाल हे परभणी जिल्ह्यात राहणारे कापड व्यावसायिक. ते जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा आले तेव्हा चालताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना स्पष्ट दिसत होती. ""डॉक्‍टर, गेल्या दोन वर्षांपासून ही असह्य कंबरदुखी सुरू झाली आहे. उठून चालायला लागलो, की कंबरेच्या मध्यभागी वेदना सुरू होते. चालणं तसंच चालू ठेवलं तर हे दुखणं असह्य होतं. कंबरेच्या आतल्या भागात कुणीतरी "खिळा टोचल्याप्रमाणे' वेदना होते. हळूहळू कंबरेतून मांड्यांच्या मागच्या भागात हे दुखणं उतरतं आणि मी पुढे चालूच शकत नाही. दोनही पाय जड पडून मुंग्या येतात व मला कुठेतरी झोपावं लागतं.''

लालजींनी त्यांच्या कंबरेचा एक्‍स-रे व एम.आर.आय. करून घेतलेले होते. त्यांच्या कंबरेचा चार नंबरचा मणका पाच नंबरच्या मणक्‍यावर घसरलेला दिसत होता. मी लालजींना व त्यांच्या मुलाला ते दाखवले.

""लालजी, अशा प्रकारच्या मणक्‍याच्या "घसरण्याला' "स्पॉंडिलोलिस्थेसिस' म्हणतात. तुम्ही उभे राहिलात, की शरीराच्या वजनाच्या भाराने तो मणका आणखीनच घसरतो व नसांवर दाब येतो. मणका घसरल्याने कंबरदुखी सुरू होते व नसांवरील जागामुळे पाय जड पडतात. ... खरं तर हा त्रास गेली दोन वर्षं तुम्ही कारण नसताना सहन करता आहात. शस्त्रक्रियेने घसरलेला मणका आपण पूर्वस्थितीला सहजगत्या आणू शकतो. त्यामुळे मणका घसरणं तर थांबतंच, पण नसांवरचा दाबसुद्धा निघून जातो. ही शस्त्रक्रिया तुम्हाला नवसंजीवनी देईल, हे निश्‍चित.''

लालजींचे दुखणेच इतके तीव्र होते, की त्यांनी ही शस्त्रक्रिया लगेचच करण्याचा निर्णय घेतला. आधुनिक यंत्रणेने आम्ही त्यांचे मणके जागेवर आणून जोडले व आज लालजी एखाद्या तरुणाप्रमाणे परत कामाला लागले आहेत. आपल्या कंबरेच्या कण्यामध्ये पाच मणके असतात. निसर्गाने त्याची अत्यंत सुव्यवस्थित रचना केलेली आहे. हे पाच मणके व त्यांच्यामधील कुर्चा (गाद्या) एकावर एक नेटक्‍या रचलेल्या असतात. स्पॉंडिलोलिस्थिसिस (स्पॉंडिलो- मणक्‍यांचे; लिस्थेसिस- घसरणे) या आजारात एक मणका दुसऱ्या मणक्‍यावर "घसरतो'. सुरवातीला हे घसरणे अगदी किरकोळ असते. हळूहळू हा मणका अधिकाधिक घसरत जातो. या घसरण्यामुळे कंबरेतून पायाकडे जाणाऱ्या नसा दाबल्या जाऊन त्यांच्यावर ताण येतो. उभे राहिल्यावर कंबरेच्या मणक्‍यात असह्य वेदना होणे, चालताना या वेदना वाढून पायांत कळा येणे, मुंग्या व जडपणा येणे, अशी लक्षणे दिसतात. आजार दुर्लक्षित केल्यास पायांत कमजोरी येत जाते. व्यक्तीला रोजच्या जीवनातील साध्या गोष्टीसुद्धा करता येईनासा होतात. आजार फारच वाढल्यास लघवीवरचे नियंत्रण नाहीसे होऊ शकते.

न्यूरोसर्जरी क्‍लिनिकमध्ये रुग्णाची लक्षणे ऐकून व शारीरिक तपासणी करून याचे प्राथमिक निदान केले जाते. मणक्‍याच्या इतर आजारांप्रमाणेच "एक्‍स रे' व एमआरआय तपासण्यांवरून याचे निश्‍चित निदान होते.

अगदी प्राथमिक अवस्थेत "फ्लेक्‍शन' प्रकाराच्या व्यायामांनी व इतर उपचारांनी काही काळ आजारावर नियंत्रण ठेवता येते, परंतु आजार वाढल्यास योग्य वेळी शस्त्रक्रिया न केल्यास गंभीर परिस्थिती उद्‌भवू शकते.

या शस्त्रक्रियेत घसरलेला मणका पूर्वस्थितीला आणला जातो व तो परत घसरू नये म्हणून स्क्रू व रॉडच्या साह्याने कायमचाच "फिक्‍स' करून ठेवला जातो. सुदैवाने "टायटॅनियम' धातूचे अतिशय आधुनिक स्क्रू व रॉड आज उपलब्ध आहेत. अगदी कमी वजनाचे पण अत्यंत भक्कम असे हे स्क्रू मणक्‍याला कायमचीच बळकटी देतात व रुग्णाला वेदनामुक्त करून टाकतात. अर्थात मणक्‍याच्या इतर आजारांप्रमाणे नेमक्‍या कोणत्या रुग्णाला शस्त्रक्रिया लागेल, हे ठरवणे हेच कौशल्याचे काम आहे.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Wednesday, July 14, 2010

वैद्यकाच्या दाही दिशा : अस्तित्वाचे हार्डवेअर सांभाळा.

डॉ. उल्हास कोल्हटकर
विविध व्याधी विकारांवर उपलब्ध असलेल्या उपचारपद्धतींकडे एक धावती नजर टाकली तरी त्यांचे अधिष्ठान फार पूर्वीच्या काळी फक्त ‘देह’ हेच होते उदा. मसाज, सांधे व मऊ उती यांच्या मसाजावर अधिष्ठित चिनी उपचारपद्धत टय़ुइना (Tuina) इ. व आता त्या अधिकाधिक ‘मना’धिष्ठित होत चालल्या आहेत. उदा. डॉ. बारव पुष्पोपचार पद्धती इ. हे सहज लक्षात येते. वास्तविक अस्तित्वाचे दोन्ही आयाम ‘मन’ व ‘देह’ हे महत्त्वाचे आहेत, परस्परावलंबी आहेत व कोणत्याही व्याधी विकारात दोघांवर उपचार महत्त्वाचे असतात हे विसरून चालणार नाही. दीर्घकालिक हृदयविकाराने वा किडनीच्या विकाराने ग्रस्त व्यक्ती हताश होतात, निराश होतात व त्यांना मानसोपचारांची गरज लागते तर नैराश्यग्रस्त मनोरुग्णांना मसाज, व्यायाम इ.ची जोड दिल्यास त्यांची स्थिती सुधारते. आज ‘मनो’धिष्ठित उपचारपद्धती अधिक लोकप्रिय होत चालल्या असल्या तरी ‘देहा’वर उपचार विसरून चालणार नाही. सॉफ्टवेअर तर उत्तम हवेच; पण त्याच्या आविष्कृतीकरिता ‘हार्डवेअर’ ही तितकेच महत्त्वाचे व त्याचे आरोग्य सांभाळणे व बिघडल्यास ते दुरुस्त करणे हेही अति आवश्यक! जगभर व विशेष करून युरोप-अमेरिकेत लोकप्रिय असलेली एक हार्डवेअर थेरपी म्हणजे ‘ऑस्टिओपथी!’ एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकन फिजिशिअन्सपैकी सुमारे ५.५ टक्के फिजिशिअन्स हे ऑस्टिओपथिक फिजिशिअन आहेत हे लक्षात घेतले तर ऑस्टिओपथीची लोकप्रियता ध्यानात येण्यास वेळ लागणार नाही. काय आहे ही ऑस्टिओपथी?
इतिहास : डॉ. अ‍ॅन्ड्रय़ू टेलर स्टील (Dr. Andrew Still’’) 
हा कान्सास प्रांतातील बाल्ड्विन शहराजवळ राहणारा ‘अमेरिकन सिव्हिल वॉर’मधील एक नेता. हाा ऑस्टिओपथीचा जनक. त्याने १० मे १८९२ रोजी मिसुरी प्रांतातील ‘कर्कस्व्हिले’ येथे अमेरिकन स्कूल ऑफ ऑस्टिओपथीची स्थापना केली. आज त्याच स्कूलची मोठी A. T. still University  झाली आहे. ऑस्टिओपथीच्या शास्त्रशुद्ध शिक्षणाचा इतका व्यापक पाया व अभ्यासक्रम डॉ. टेलर यांनी तयार केला, की मिसुरी राज्याने त्यांच्या ऑस्टिओपथी स्कूलला, स्नातकांना इतर डॉक्टरांप्रमाणे ‘एम. डी.’ डिग्री देण्याचीही अनुमती दिली; पण आपले वैशिष्टय़ जपण्याकरिता डॉ. टेलरने ती नाकारून ‘डी. ओ.’ (डॉक्टर ऑफ ऑस्टिओपथी) अशी डिग्री देणे चालू केले. आज अमेरिकेत अन्य डॉक्टरांप्रमाणे औषधे वा आवश्यक तेव्हा शल्यक्रिया वापरणारे असे ‘ऑस्टिओपथी फिजिशिअन’ हे वेगळे असून ‘नॉनफिजिशिअन ऑस्टिओपाथ’ जे केवळ Osteopathic Manipulative Treatment (OMT)  देतात असे वेगळे आहेत, त्यांचे अभ्यासक्रम वेगळे आहेत व विविध अमेरिकन राज्यात त्यांच्याकरिता वेगवेगळे वैद्यकीय कायदेकानू लागू आहेत. युरोप व कॉमनवेल्थ देशांत हे दुसऱ्या प्रकारचे उपचारक   अधिक लोकप्रिय असून, त्यांची उपचारपद्धती ही कायद्याच्या दृष्टीने ‘पर्यायी’ उपचारपद्धती म्हणून गणली जाते, असे उपचारक स्वत:ला चेता-स्नायू- अस्थि विशेषज्ञ  M. N. M. S. Specialis  म्हणवून घेताना आढळतात.
‘स्नायू अस्थि व सांधे ‘यांचा सांगाडा व त्याचे आरोग्य राखणे हे ऑस्टिओपथीच्या तत्त्वानुसार अतिमहत्त्वाचे असते. त्यातील बिघाड हा चेतासंस्थेच्या ऊर्जेत व पर्यायाने सर्व शरीराच्या ऊर्जेत बिघाड घडवून आणतो व रोगनिर्मिती होते, असे हे शास्त्र मानते. या सांगाडय़ाच्या आरोग्यावर आतील अवयवांचेही आरोग्य अवलंबून असते व हीच मध्यवर्ती कल्पना मानून सन १९४० च्या दरम्यान एच. व्ही. हुवर व एम. डी. यंग या दोन ऑस्टिओपायनी ? व्हिसेरल ? ऑस्टिओपथी  (Visceral osteopathy)  म्हणजे अवयवाधिष्ठित ऑस्टिओपथी अशी नवीन शाखा निर्माण केली.
कवटीची हाडे व मणके यांच्या संरक्षणात मेंदू व मज्जारज्जू कालक्रमणा करतात. त्यांच्या (मेंदू व मज्जारज्जू) भोवती  Meninges  चे संरक्षक आवरण असते तर मस्तिष्कद्रवात (Cercbrospinalflnid) ते एक प्रकारे डुंबत असतात. या रचनेत काही बदल झाल्यास, मस्तिष्कद्रवाच्या प्रवाहात अडथळे आल्यास, या संपूर्ण रचनेच्या आतील दाबात काही फरक पडल्यास त्यामुळे चेतासंस्थेच्या (व पर्यायाने संपूर्ण शरीराच्या) कार्यात बिघाड होतो, हा बदल डोक्यावरून हात फिरवून वा पाठीच्या मणक्यांवरून हात फिरवून तज्ज्ञाला जाणवू शकतो व योग्य त्या ठिकाणी दाब देऊन तो हा बदल नाहिसा करून ही संपूर्ण रचना पूर्वस्थितीत आणू शकतो या गृहीत तत्त्वावर डॉ. विल्यम सुदरलँड (Dr. william Sutherland) याने  Cranial Ostcopathy ही एक नवीन शाखा अस्तित्वात आणली. मुख्यत्वे खालच्या मणक्यांवर आधारित अशी  Craniosaoral Theropy  सुद्धा अस्तित्वात आहे. अर्थात व्हिसेरल, क्रॅनिअल वा क्रॅनिओर्सेक्रल या सर्व पद्धतींबाबत क्लासिकल ऑस्टिओपाय वा अन्य डॉक्टरांच्या मनात अजूनही प्रचंड शंका आहेत.
ऑस्टिओपथीचा परिणाम नेमका कसा होतो?
अस्थि, स्नायू, सांधे- जोड उती’ यांचा प्रचंड सांगाडा हा चेतासंस्था वा शरीरांतर्गत अन्य अवयव संस्था यांच्या संरक्षणाकरिता, परस्परसंपर्काकरिता व बाह्यजगातील हालचालींकरिता आवश्यक आहे हे सहज मान्य होण्यासारखे आहे; पण जवळजवळ सर्वच व्याधी विकारांचे उगमस्थान या सांगाडय़ातच असते व तो ठीकठाक केल्यास संपूर्ण आरोग्यप्राप्ती होते व आता ज्ञात असलेल्या वैद्यकीय माहितीमुळे, पचनी पडणे थोडे कठीणच आहे. अर्थात ऑस्टिओपथीतील मुख्य  Manipulation बरोबरीनेच आहार, व्यायाम, ढब सुधारणे, व्यावसायिक उपदेश (Ocupaticnal advise)  इ.चा वापर केल्याने अनारोग्यकारक विविध घटकांचा परामर्श घेतला जाऊन, आरोग्यप्राप्ती तणावजन्य डोकेदुखी अशा विविध दुखण्यात ऑस्टिओपथीमुळे जे उत्तम परिणाम मिळतात त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केल्यानंतर हे परिणाम या थेरपीमुळे कदाचित शरीरात निर्माण होणाऱ्या सूजनिवारक ‘इंटरल्युकिन्स’ या द्रव्यांमुळे (Antiintlammatary Interleukins)  होत असावेत, असे दृष्टोत्पत्तीस आले आहे. डिसेंबर २००७ च्या ‘जर्नल’ ऑफ अमेरिकन ऑस्टिओपथिक असोसिएशन’मध्ये या संबंधीची सविस्तर माहिती आली आहे ती जिज्ञासुनी जरूर पाहावी.
आपली बिघडलेली स्थिती नीट करण्याची प्रत्येक शरीराची आपली अंतर्गत अशी क्षमता असते. शरीराची ही बरे होण्याची क्षमता ‘अस्थि, स्नायू, सांधे, जोड उती’ या यंत्रणेमार्फत पूर्वस्थितीत आणणे हे ‘ऑस्टिओपथी’ या उपचार पद्धतीचे मध्यवर्ती तत्त्व होय.
ऑस्टिओपथी कोठे उपयुक्त?
आज कंबरदुखीपासून ते फुप्फुसांच्या संक्रमणापर्यंत अनेक व्याधीविकारांवर ऑस्टिओपथीचे उपचार होत असले तरी प्रामुख्याने कंबरदुखी, पाठदुखी, तणावजन्य डोकेदुखी या विकारांवर ऑस्टिओपथी जास्तीत जास्त गुणकारी असते, असे म्हणता येईल. याव्यतिरिक्त खेळांमधील दुखापतींवर तसेच सांध्याच्या लवचिकतेकरिताही ऑस्टिओपथीचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे ऑस्टिओपथ सांगतात.
मुळात, आरोग्याचा शारीरिक आयाम ऑस्टिओपथी अधोरेखित करतो व त्यातच तिचे महत्त्व व ताकद लपलेले आहेत, असे नमूद करावेसे वाटते.
ऑस्टिओपथीची आठ प्रमुख तत्त्वे :
१) शरीर ही एक स्वयंपूर्ण यंत्रणा आहे.
२) शरीररचना व शरीराचे कार्य परस्परावलंबी असतात.
३) शरीराची स्वनियंत्रणाची अशी यंत्रणा असते.
४) शरीराची स्वसंरक्षणाची व स्वत:ला ‘बरे करण्याची’ क्षमता असते.
५) ही क्षमता ओलांडल्यास रोगनिर्मिती होते.
६) शरीरस्वास्थ्याकरिता शरीरांतर्गत द्रवांची (Body Fluids) हालचाल आवश्यक.
७) चेतासंस्था व ‘नसा’ (Nwrves) यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
८) रोगाचे देहिक घटक, रोगट स्थिती राहण्यास मदत करतात (व म्हणून त्यावर उपचार महत्त्वाचे!---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad