Showing posts with label वातविकार. Show all posts
Showing posts with label वातविकार. Show all posts

Saturday, December 10, 2011

थंडीतील उपचार - मसाज 1


डॉ. श्री बालाजी तांबे
निरोगी शरीराला उचित स्निग्धता अत्यावश्‍यक असते. म्हणूनच आयुर्वेदाने अभ्यंगाच्या माध्यमातून "बाह्यस्नेहन' रोजच्या दिनक्रमात अंतर्भूत केले आहे. अभ्यंग हिवाळ्यात तर करायचा असतोच, पण संपूर्ण वर्षभर अधूनमधून अभ्यंग करणे प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी उत्तम असते.

थंडी पडली, की वातावरणात कोरडेपणा वाढतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही. शरीराला आतून-बाहेरून स्निग्धतेची आवश्‍यकता भासू लागते. याला आयुर्वेदात "स्नेहन' असे नाव दिलेले आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही यंत्राला वंगणाची आवश्‍यकता असते, साध्या वाहनातही नुसते इंधन घालणे पुरत नाही, त्याप्रमाणे निरोगी शरीराला उचित स्निग्धता अत्यावश्‍यक असते. म्हणूनच आयुर्वेदाने अभ्यंगाच्या माध्यमातून "बाह्यस्नेहन' रोजच्या दिनक्रमात अंतर्भूत केले आहे. अभ्यंग हिवाळ्यात तर करायचा असतोच, पण संपूर्ण वर्षभर अधून मधून अभ्यंग करणे प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी उत्तम असते.

अभ्यंग शब्दातील "अंग' हे क्रियापद गती या अर्थाने आलेले आहे. जेथे जेथे गती असते तेथे उष्णता व ऊब तयार होतेच उदा. थंडीच्या दिवसांत एका ठिकाणी बसले किंवा उभे पाहिले की वाजणारी थंडी चालले, पळले की अजिबात वाजेनाशी होते. त्याचप्रमाणे संपूर्ण शरीरात ज्या क्रियेमुळे गतीमानता येते, अशा अभ्यंगाने शरीराला ऊब मिळणे सहज शक्‍य असते.

अभ्यंगातून ऊब
ऊब ही रक्‍ताभिसरणावरही अवलंबून असते. फार वेळ एका ठिकाणी बसल्यावर पायाला मुंग्या येतात. अशा वेळी पाय थंड पडतो, याचा सगळ्यांना अनुभव असेल. पाय हलवला आणि रक्‍ताभिसरण पूर्ववत सुरू झाले की पायाचे तापमान पुन्हा पूर्वीसारखे होते. अभ्यंगामुळे रक्‍ताभिसरणाला मदत मिळत असल्याने अभ्यंग शरीराला ऊब देण्यास उत्तम असतो. शरीरातील ऊब कमी झाली की हालचालींवरही मर्यादा येतात. आईस्क्रीम खाल्ल्यामुळे जीभ गारठली की बोलता येत नाही, हात गारठले की बोटे जखडल्यासारखी वाटतात, याचाही सर्वांना अनुभव असेल. म्हणूनच सर्व हालचाली व्यवस्थित व्हाव्यात, हालचालींमधला सहजपण, चपळपणा कायम राहावा, यासाठीही अभ्यंग, अभ्यंगातून मिळणारी ऊब आवश्‍यक असते.

अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणे. हे तेल वातशामक, सुगंधी द्रव्यांनी संस्कारित असावे, असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे.

यथा जातान्न पानेभ्यो मारुतघ्नैः सुगन्धिभिः ।
अथर्तु सस्पर्श सुखैस्तैलैः अभ्यंगमाचरेत्‌ ।। ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान

वातशामक, सुगंधी द्रव्यांनी संस्कारित असे ऋतूला व प्रकृतीला अनुकूल तेल, जे स्पर्श केले असता सुखकर असते, अभ्यंगासाठी वापरावे. क्वचित काही ठिकाणी औषधांनी संस्कारित तूप किंवा वसा (मांसातील स्निग्ध पदार्थ) वापरण्यासही सांगितले आहे. मात्र सहसा तिळाचे तेल अभ्यंगासाठी उत्तम समजले जाते.

रोज करायचा अभ्यंग स्वतः स्वतःला करायचा असतो. मात्र प्रशिक्षित परिचारकाकडून (ट्रेंड थेरपिस्ट) अभ्यंग करून घेण्याचे फायदे वेगळे असतात. विशेषतः पंचकर्म करताना बाह्यस्नेहन म्हणून करायचा अभ्यंग किंवा वातविकारात उपचार म्हणून घ्यायचा अभ्यंग किंवा अति प्रवास, अति दगदग, अति मानसिक ताण यांचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून घ्यायचा अभ्यंग हा मसाजिस्ट - थेरपिस्टकडून करून घेणे अधिक गुणकारी असते.

पेशीच्या ठेवणीनुसार मसाज
मसाज करणाऱ्याला मानवी शरीराचे रचनात्मक व क्रियात्मक ज्ञान असणे आवश्‍यक असते. विविध मांसपेशी, त्यांचा उगम, विस्तार, दिशा यांची सविस्तर माहिती असावी लागते. सांध्यांच्या ठिकाणी असणारी दोन किंवा अधिक हाडांची रचना, सांध्यांना पकडून ठेवणाऱ्या स्नायूंची रचना, रक्‍तवाहिन्या, मज्जातंतूंचे स्थान, विविध मर्मे वगैरे अनेक गोष्टी मसाज करण्यापूर्वी माहीत असाव्या लागतात.

मसाजचे परिणाम सर्व शरीरात होत असले तरी मसाज केला जातो तो वरच्यावरच. त्वचेच्या आश्रयाने राहणारे भ्राजक पित्त तेलाचा स्वीकार करून त्याचे पचन करून ते सर्व शरीरपोषणासाठी शोषून घेते. अर्थात यासाठी वापरले जाणारे तेलही उत्तम प्रतीचे, औषधांनी सिद्ध केलेले व अग्नीचा यथायोग्य संस्कार झाल्याने "सूक्ष्म' अर्थात लहानात लहान पोकळीतही पोचण्याचे सामर्थ्य असणारे असावे लागते. नुसतेच अर्क किंवा सुगंध घातलेले तेल किंवा कमी दर्जाचे तेल, कच्चे तीळ तेल वा खोबरेल तेल वापरून कितीही चांगला मसाज केला तरी त्याने तेलाचे आतपर्यंत जिरण्याचे व त्यायोगे धातुपोषणाचे कार्य होऊ शकत नाही.

मसाज करताना प्रत्येक पेशीचा आकार ध्यानात घ्यावा लागतो. नाजूक पेशीच्या ठिकाणी मसाजही नाजूकपणेच करावा लागतो, तर बळकट पेशीला मसाज करताना बळ पणाला लावावे लागते. तसेच पेशीचा आकार, तिची दिशा, लांबी यावरून त्या ठिकाणी कसा मसाज करायचा ते ठरवले जाते. पेशीच्या नैसर्गिक ठेवणीनुसार मसाज केल्यास तो सुखावहही ठरतो व उपयोगीही असतो; अन्यथा त्याने पीडा कमी होण्याऐवजी वाढूही शकते.

'मर्मा'वर बोट
मसाजचा विचार करताना "मर्म' हाही विचारात घेण्याजोगा महत्त्वाचा मुद्दा होय. प्राणशक्‍तीचे अस्तित्व सर्व शरीरात असले तरी काही विशिष्ट ठिकाणी ती अधिक प्रमाणात एकवटलेली असते. आयुर्वेदात या विशिष्ट ठिकाणांना "मर्म' ही संज्ञा दिली आहे. मर्माच्या ठिकाणी शरीरातील शिरा, स्नायू, संधी, अस्थी, मांस यांपैकी एकाहून अधिक घटक एकत्र आलेले असतात व त्यामुळे मसाज करताना त्याच्या ठिकाणी किती प्रमाणात दाब द्यावा, किती वेळ दाब द्यावा, या गोष्टीचा विचार करावा लागतो.

मसाजचे सार्वदैहिक मसाज आणि स्थानिक मसाज असे दोन प्रकार संभवतात. वातशमनासाठी आणि शरीरशक्‍ती वाढून स्वास्थ्य टिकवण्यासाठी केला जाणारा मसाज सर्व शरीरभर केला जातो; मात्र पाठ दुखत असल्यास नुसत्या पाठीला किंवा पायाला सुन्नपणा आला असल्यास फक्‍त पायांना असा स्थानिक मसाजही केला जातो.

संपूर्ण शरीराचा मसाज होण्यासाठी साधारणतः एक तास लागू शकतो. मसाज झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तास विश्रांती घ्यावी, वाऱ्याचा झोत अंगावर येणार नाही याची काळजी घ्यावी. वाहनातून जायचे झाल्यास कानाला स्कार्फ बांधावा. थंडीच्या दिवसांत पायात मोजे घालावेत. अशा प्रकारे अभ्यंग, मसाजसाठी रोजच्या व्यापातून थोडा वेळ काढला, तर त्यामुळे जीवन उबदार व्हायला आणि जीवनाचा आनंद द्विगुणित व्हायला निश्‍चित हातभार लागेल.

मसाज करण्याचा सर्वसाधारण क्रम
- मसाज करताना सर्वप्रथम तेलाचे दोन थेंब टाळूवर हलक्‍या हाताने चोळावेत, तसेच कानांमध्ये व नाभीवर दोन-तीन थेंब टाकावेत. मसाज करताना नेहमी पायापासून सुरवात करावी. प्रथम पायाच्या तळव्यांवर तेल जिरवावे. मसाज करताना पायाच्या तळव्यापासून सुरवात करावी. घोटा, गुडघा या ठिकाणी गोलाकार मसाज करावा. पोटरी, मांडीला सोसवेल त्याप्रमाणे दाब देऊन मोकळे करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर दुसरा पाय करावा.

- यानंतर हाताच्या तळव्यापासून सुरवात करावी, मनगट व कोपरावर वर्तुळाकार तर बाकी दंडाला वगैरे अंगठा व चार बोटे यांच्या साहाय्याने दाब सोसवेल अशा पद्धतीने मसाज करावा.
- पोटावर मसाज करताना मोठ्या आतड्याची रचना व गती ध्यानात घ्यावी लागते. फार दाब न देता वर्तुळाकार गतीने मसाज केल्यास आतड्यातील वायूला स्वाभाविक गती मिळते व सरून जायला मदत होते.
- कूस व छातीवरती हलक्‍या हाताने मसाज करावा. छातीवर दोन्ही हातांनी छातीच्या हाडापासून ते खांद्यापर्यंत मसाज करावा.
- नितंब, अंसफलक (scapula) यांठिकाणी मांसपेशी व हाडाच्या आकारानुरूप गोलाकार मसाज करावा. कंबर व संपूर्ण पाठीलाही खालून वरपर्यंत सरळ रेषेत मागे पाहिल्याप्रमाणे वाहक, कंपन वगैरे पद्धतीने मसाज करावा. मानेवर मात्र दाब न देता हलक्‍या हाताने तरंग पद्धतीने वर जावे. पाठ व मानेला जोडणाऱ्या मांसपेशी त्रिकोणाकार असल्याने त्यांच्यावर मसाज करताना त्यांचा विशिष्ट आकार ध्यानात घ्यावा लागतो. चेहऱ्यावरही मसाज अत्यंत हलक्‍या हाताने करावा व त्याची दिशा जबड्यापासून ते कानशिलापर्यंत ठेवावी.
- मसाज करताना वापरावयाचे तेल किंचित गरम करून वापरावे. याने वात शमन व्हायला अधिक मदत मिळते, तसेच तेलाचे शोषणही अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.
- मसाज घेताना पोट रिकामे असू नये, तसेच जेवल्याजेवल्याही मसाज घेऊ नये.
- मसाज करायची जागा हवेशीर असावी; मात्र प्रत्यक्ष हवेचा झोत अथवा वारा येणार नाही याची काळजी घ्यावी. खोलीत पुरेसा उजेड असावा.
- मसाज घेताना शयनस्थिती सर्वांत उत्तम होय. पालथे झोपलेल्या स्थितीत पाठीचा कणा, मान, नितंब, यावर मसाज केला जातो, तर पाठीवर झोपलेल्या स्थितीत हात, पाय, पोट, छाती व चेहऱ्यावर मसाज केला जातो. एखाद्या व्यक्‍तीला झोपणे, विशेषतः पालथे झोपणे शक्‍य नसेल, तर मात्र मसाज बसूनही करता येतो.

उबदार अभ्यंग -2


डॉ. श्री बालाजी तांबे
आपल्याला ऊब ही हवीच असते. उबेचे महत्त्व समजल्यामुळे मनुष्य दोन पायांवर उभा राहिला व त्याने आपला मेरुदंड पृथ्वीच्या काटकोनात आणून ठेवला. उठून बसल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते, रक्‍तप्रवाह मेंदूकडे जाऊ लागतो व त्यातूनच ध्यानासाठी, योगासने करण्यासाठी, शरीरस्वास्थ्य, आत्म्याचे स्वास्थ्य, आत्म्याचे कल्याण ह्यासाठी पद्मासनात ताठ बसावे हा शोध लागला. मात्र, थंडीच्या दिवसात उबदार रजई पांघरून घेऊन झोपणे कल्याणकारक असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्तम तेलाचा अभ्यंग हा खरा थंडीवरचा उपचार.
उबेचे माहात्म्य आपण सर्वांनी जाणून घेतलेले आहे व त्यामुळे लहान मुले आईच्या कुशीत येऊन का झोपतात ह्याचा बरोबर उलगडा होऊ शकतो. शरीरात पायापर्यंत रक्‍तप्रवाह पोचला नाही, काही कारणांनी पायामध्ये पाणी राहून पाय जड झाला, थंड पडला किंवा डोक्‍याला वारा लागल्यामुळे डोके थंड झाले, तर चोळल्याने म्हणजे घर्षणाने ऊब मिळते. छाती व छातीच्या आसपासचा भाग नेहमी गरम राहतो, कारण हृदय सतत धडकत असते. त्याचे आकुंचन-प्रसरण सतत चालू असल्यामुळे मिठी मारताना, कुशीत येताना छातीजवळ डोके वा शरीर येण्याने ऊब चांगली मिळते, हा सर्वांच्याच अनुभवाचा विषय असतो.

एक गोष्ट नक्की, की आपल्याला ऊब ही हवीच असते. परंतु अति ऊब वा अति अग्नी त्रासदायक ठरू शकतो. पृथ्वीचे तापमान वाढते आहे व त्यामुळे वातावरणात बदल होत आहेत. वृक्ष, वनराई, नद्या, पर्वत, बर्फाच्छादित शिखरे यात होणाऱ्या बदलांमुळे पृथ्वीवर अनर्थ ओढवेल की काय, अशी शंकेची पाल मनात चुकचुकलेली आहे. योग्य प्रमाणात अग्नी म्हणजे ऊब. शरीर गरम झाले, की तापावर औषध द्यावे लागते. ज्याचे शरीर जास्त प्रमाणात उष्ण राहते, त्याला थकवा लवकर येतो, अर्थात त्या प्रमाणात त्याचे आयुष्यही कमी होते.

तेव्हा एका बाजूने उष्णता-ऊब आवश्‍यक असते, तर दुसऱ्या बाजूने अति उष्णता कामाची नसते. थंडी वाजल्यावर एखादा मनुष्य थोडे चालून आला किंवा जागच्या जागी पळाला, तर त्याला बरे वाटते. परंतु तो खूप पळाला, तर दमून जाणे, पाय दुखणे वगैरे त्रास होऊ शकतात. मनुष्येतर प्राणिमात्रांचा मेरुदंड जमिनीला समांतर असतो, परंतु उबेचे महत्त्व समजल्यामुळे मनुष्य दोन पायांवर उभा राहिला व त्याने आपला मेरुदंड पृथ्वीच्या काटकोनात आणून ठेवला. हे गणित लक्षात घेतले तर उठून बसले, की थंडी कमी का होते हे लक्षात येईल. पळाल्यानंतर थंडी खूप कमी होईल हे वेगळे, पण उठून बसल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते, रक्‍तप्रवाह मेंदूकडे जाऊ लागतो व त्यातूनच ध्यानासाठी, योगासने करण्यासाठी, शरीरस्वास्थ्य, आत्म्याचे स्वास्थ्य, आत्म्याचे कल्याण ह्यासाठी पद्मासनात ताठ बसावे हा शोध लागला. बरे वाटावे, उत्साह यावा यासाठी बसणे किंवा उभे राहणे आवश्‍यक असते. तसेच 24 तासातील निदान सहा - सात तास आडवे राहिले नाही, तर मनुष्य उष्णतेमुळे थकून जातो. म्हणून थंडी वाजते आहे ह्या कारणासाठी झोपायचेच नाही असे ठरवून चालत नाही.

थंडीच्या दिवसात, मग ती गुलाबी थंडी असो, कडकडीत थंडी असो,छान पैकी उबदार रजई पांघरून घेऊन झोपणे कल्याणकारक असते.
जमिनीवर मांडी घालून ताठ बसणे किंवा ऊबदार रजई घेऊन झोपणे हा झाला तात्पुरता इलाज. परंतु थंडीपासून खरे संरक्षण केवळ कुडकुडणे थांबवून मिळू शकत नाही. उत्तम तेलाचा अभ्यंग हा खरा थंडीवरचा उपचार. आपण दीपावलीच्या वेळी अंगाला तेल-उटणे लावून ओवाळतो, ते येणाऱ्या थंडीत अभ्यंग आवश्‍यक करावा लागेल हे लक्षात ठेवण्यासाठी. अभ्यंग करत असताना खोलीत खूप थंड वातावरण नसावे. अभ्यंगाच्या वेळी बाहेर खूप थंडी असेल तर खोलीत शेगडी पेटवून ठेवावी

Friday, December 9, 2011

उबदार अभ्यंग -1


डॉ. श्री बालाजी तांबे
केव्हातरी थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता येते.

थंडीच्या दिवसांत असते थंडगार वातावरण, थंडगार हवा, थंडगार पाणी, थंडगार स्पर्श. थंडी म्हणजे गोठणे. गोठणे याचा अर्थ इतरांपासून वेगळे पडणे. सर्व जगात पूजा होते अग्नीची. कारण तो सर्वांना आकर्षित करतो, जवळ आणतो. या अग्नीचे आकर्षण एवढे असते, की शरीरातूनसुद्धा पाहिली जाते ऊब. हालचाल करत नसलेल्या माणसाच्या कपाळाला स्पर्श करून पाहतात, की तो आहे की गेला. म्हणजेच त्याच्या शरीरात ऊब आहे की तो थंड पडला, हे पाहिले जाते. त्याच्या स्पर्शावरून कळते, की जीवन प्रवाहित आहे की नाही. जीवनप्रवाहातून वेगळेपणा कोणालाच आवडत नाही. जीवनप्रवाहात राहणे व जीवनाची ऊब मिळविणे, त्याचा आनंद घेणे प्रत्येकालाच आवडते.

अशा या थंडीमध्ये, एकसंध असलेली शरीराची त्वचा किंवा स्नायू गोठायला म्हणजे आखडायला सुरवात होते. त्वचेचा काही भाग गोठला, आखडला की इतर भागापासून सुटा पडतो, म्हणजेच शरीरावर भेगा पडायला सुरवात होते, शरीर तडतडायला लागते आणि कंड सुटायला लागते.

हे सर्व टाळण्यासाठी औषध एकच असते व ते म्हणजे ऊब. आपल्याला ऊब अनेक प्रकारे मिळते. ऊब मिळवायचा सोप्यात सोपा मार्ग म्हणजे शरीर चोळणे, घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे, मसाज करणे. त्यानंतर ऊब मिळविण्यासाठी करावी लागते धावपळ, म्हणजेच व्यायाम. तसेच ऊब मिळविण्यासाठी योग्य आहाराची योजना करणे आवश्‍यक असते. तसे पाहता थंडीच्या दिवसांत बाहेर सूर्यप्रकाशात, त्याच्या उबेत बसण्याएवढे आनंददायक दुसरे काही नाही. म्हणून सूर्यध्यान, खास ऊब देणाऱ्या पदार्थांचे सेवन अशा गोष्टींपासून ऊब मिळविणे आवश्‍यक असते. त्यानंतरही समाधान झाले नाही तर शेकोटी पेटवून बसणे, होळीसारखे उत्सव साजरे करणे, अशा प्रकारच्या योजना करून मनुष्य ऊब मिळविण्याच्या मागे लागतो. अर्थात थंडीच्या दिवसांत उबदार कपडे घालून संरक्षण करता येते.

थंडी हा ऋतू चांगला असतो. त्यामुळेच आपण पाहतो, की थंड प्रदेशांतील लोक भरपूर अन्न खातात, पेये पितात, मेहनत करतात, ते उंचेपुरे, गोरेगोमटे असतात. पण तेथली थंडी सहन करण्यासाठी ऊब आवश्‍यक असतेच. तेथे घरे गरम करण्याची व्यवस्था असते, गरम कपडे वापरावे लागतात.

भारतासारख्या प्रदेशात एकमेकाला भेटल्यानंतर दुरूनच नमस्कार करून मिळालेली ऊब पुरेशी ठरते, पण थंड प्रदेशांत गेले तर हाताला हात मिळवून उबेचे आदान-प्रदान व्हावे लागते आणि एवढ्याने समाधान झाले नाही तर कडकडून मिठी मारावी लागते.

शरीराच्या एखाद्या भागाला, पायाच्या बोटाला रक्‍ताभिसरण कमी झाले, तेवढा भाग रक्‍तसंचारापासून वंचित झाला तर तेवढा भाग थंड पडून बधिर होण्याची, तेथे मुंग्या येण्याची शक्‍यता असते. असे झाल्यास नखावर खाजवले असता पुन्हा तेथील रक्‍ताभिसरण वाढून ऊब निर्माण होते व त्रास जातो. हात गार पडून लिहिता येत नाही, काम होत नाही, अशा वेळी दोन हात एकमेकांवर घासण्याची क्रिया साहजिकच घडते. थोडी अधिक माहिती असणारा मनुष्य पुढून-मागून सर्व दिशांनी हात घासतोच व बरोबरीने बोटे एकमेकांत अडकवून, दाबून धरून ओढायचा प्रयत्न करतो, म्हणजे बोटांच्या कडांचे, दोन बोटांच्या मध्ये असलेल्या जागेचे घर्षण होते आणि उबेचा उत्साह येतो. पाठीवर थाप मारायची, हाही एक ऊब देण्याचाच प्रकार.

हे सर्व लक्षात घेतले तर ऊब देणे, रक्‍ताचा संचार वाढवणे, थंडीमुळे किंवा इतर कारणामुळे अवघड जागी साकळलेले रक्‍त किंवा अडकलेला रक्‍तप्रवाह दूर करण्यासाठी त्या ठिकाणी घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे- मसाज देणे अभिप्रेत असते. परंतु शरीराचे दोन भाग एकमेकांवर घासताना ते जर कोरडे असतील तर त्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या उष्णतेमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. शिवाय मुख्य म्हणजे स्नेहन, मैत्री, आपुलकी शरीराशी व्हावी लागते, त्यासाठी तेलाने किंवा तत्सम पदार्थाने मसाज करणे अभिप्रेत असते. नुसते वास दिलेले तेल असेल तर त्याचा उपयोग होत नाही. उलट अशा असंस्कारित तेलाच्या वापरामुळे त्वचेवरची रंध्रे बंद होतात. असे तेल वापरून मसाज घेताना वाटलेले सुख नंतर महागात पडते.

म्हणून आयुर्वेदाने अभ्यंगासाठी वेगवेगळ्या प्रकारची अनेक तेले सुचविलेली आहेत. ही तेले बनविताना वेगवेगळ्या वनस्पती, दूध, दही, ताक, निवळी अशी अनेक द्रव्ये वापरलेली असतात, अगदी केशर, कापरासारखी द्रव्येही वापरलेली असतात. अशा तेलाने योग्य मसाज केला तर नुसती तात्पुरती ऊब न येता शरीरात टिकून राहणारी व शरीराला फायदा करणारी ऊब तयार होते. तेव्हा थंडीच्या दिवसांत प्रत्येकाने खास मसाजसाठी तयार केलेले अप्रतिम अभ्यंग तेल घेऊन स्वतःच शरीरावर चोळून व्यवस्थित मसाज करावा. जमेल त्यांनी उपचार केंद्रात जाऊन प्रशिक्षित परिचारकाकडून मसाज करून घ्यावा.

केव्हातरी थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता येते.                        

Monday, October 24, 2011

वातव्याधीचे निदान - 2


डॉ. श्री बालाजी तांबे
संपूर्ण शरीराला व्यापून असणारा वातदोष शरीरातील प्रत्येक हालचालीचा प्रेरक असतो. वातदोष बिघडला तर शरीरात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी लक्षणे उत्पन्न करू शकतो.

वातदोष शरीरातील प्रत्येक हालचालीचा प्रेरक असतो. अर्थातच, संपूर्ण शरीराला तो व्यापून असतो. जोपर्यंत तो संतुलित असतो, तोपर्यंत आपली कामे व्यवस्थित करत असतो. मात्र, वातदोष बिघडला तर शरीरात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी लक्षणे उत्पन्न करू शकतो. उदा. कोठ्यामध्ये वात बिघडला तर त्यामुळे पुढील त्रास होतात -

- मल-मूत्रप्रवृत्ती होत नाही.
- हृदयरोग होतो.
- पोटात वाताचा गोळा अनुभूत होतो.
- बरगड्या दुखतात.
- मूळव्याधीचा त्रास होतो.

संपूर्ण शरीरात वात प्रकुपित झाला तर, त्यामुळे....
- शरीरात कुठेही फडफडल्यासारखे, स्फुरण पावल्यासारखे अनुभूत होते.
- संपूर्ण शरीरातील हाडे असह्य दुखतात.
- सर्व सांधे दुखतात.

गुदभागी वात बिघडला, तर.....
- मलमूत्रप्रवृत्ती अजिबात होत नाही किंवा व्यवस्थित होत नाही.
- पोटात दुखते, गॅसेस होतात.
- पाय, मांड्या, कंबर, पाठ या ठिकाणी वेदना होतात.
- हे अवयव सुकतात, बारीक होतात.
- मूतखड्याचा त्रास होतो.

आमाशयाच्या (खाल्लेले अन्न सर्वप्रथम साठते तो अवयव) ठिकाणी वात वाढला, तर....
- पोट, बरगड्या, हृदय, नाभीच्या भोवती वेदना होतात.
- खूप तहान लागते, घसा कोरडा पडतो.
- ढेकर येत राहतात.
- खोकला येतो, श्‍वासाची गती वाढते.

कान, नाक, डोळे वगैरे इंद्रियांच्या ठिकाणी वात वाढला तर त्यांची कार्यक्षमता कमी होते किंवा नष्ट होते.
उदा. श्रवणदोष तयार होतो, नाकाने वास येत नाही, डोळ्यांना दिसत नाही.

त्वचेच्या ठिकाणी किंवा रसधातूमध्ये वात बिघडला, तर....
- त्वचा कोरडी होते, फुटते.
- त्वचा निस्तेज होते, काळवंडते, ताणली जाते व पातळ-दुर्बल होते.
- बोटांचे छोटे-छोटे सांधे दुखू लागतात.
- रक्‍तधातूच्या ठिकाणी वाताचा प्रकोप झाला, तर...
- संपूर्ण शरीरात वेदना होतात.
- सर्वांगात दाह होतो.
- शरीराचा वर्ण बिघडतो.
- वजन कमी होते, खावेसे वाटत नाही.
- अनुत्साह प्रतीत होतो.
- शरीरावर पुरळ, फोड वगैरे येतात.

मांस व मेदाच्या ठिकाणी वातदोष वाढला, तर....
- संपूर्ण शरीराला जडपणा येतो, सुया टोचल्यासारखे वाटते.
- खूप थकवा जाणवतो, मार लागल्यावर शरीर ठणकावे त्याप्रमाणे वेदना होतात.

अस्थी व मज्जाधातूच्या ठिकाणी वात वाढला, तर....
- हाडांमध्ये तुटल्याप्रमाणे वेदना होतात.
- लहानमोठे सर्व सांधे फार दुखतात.
- ताकद कमी होते.
- मनुष्य अशक्‍त, बारीक होतो.

शुक्रधातूच्या ठिकाणी वात प्रकुपित झाला, तर -
- वीर्यस्खलन होत राहते किंवा अजिबात होत नाही.
- सहसा गर्भधारणा होत नाही, मात्र झाली तरी गर्भस्राव, गर्भपात होतो किंवा गर्भात विकृती येते.

शिरांमध्ये, रक्‍तवाहिन्यांमध्ये वात वाढला, तर.....
- शिरा संकोच पावतात किंवा शिरांच्या भिंतीतील स्थितिस्थापकत्व कमी होऊन शिरा विस्तारतात, शिथिल होतात.

सांध्यांमध्ये वात प्रकुपित झाला, तर.....
- संधिबंध शिथिल होतात.
- सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही.
- सांध्यांवर सूज येते व तीव्र वेदना होतात.

पुढच्या वेळी आपण अजून वातव्याधींचे प्रकार पाहणार आहोत.                        

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

वातव्याधीचे निदान -1


डॉ. श्री बालाजी तांबे
वात शरीराचे आरोग्य सांभाळत असतो. वातदोषाच्या असंतुलनाने वातव्याधी होतात. वातदोष कोणत्या कारणाने आणि कोणत्या स्थानी उद्‌भवतो, यावर त्याची लक्षणे व रोग ठरतात.

वातदोषाच्या असंतुलनामुळे होणारे व्याधी म्हणजे वातव्याधी. वातव्याधीचे अनेक प्रकार असतात, मात्र या सर्वांचे मूळ कारण बिघडलेल्या वातात असते.

वातव्याधीची कारणे
- कोरड्या आणि थंड पदार्थांचे अतिसेवन करणे.
- फार कमी खाणे.
- मैथुन अतिप्रमाणात करणे.
- रात्री जागरणे करणे.
- नियमांचे पालन न करता अशास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्मादी उपचार करणे.
- कोणत्याही कारणाने शरीरातून अतिप्रमाणात रक्‍तस्राव होणे.
- उड्या, पोहणे, व्यायाम वगैरेंचा अतियोग होणे.
- वेड्यावाकड्या किंवा अति प्रमाणात हालचाली करणे.
- रसादी सप्तधातूंपैकी कोणताही एक किंवा अधिक धातू क्षीण होणे.
- अतिप्रमाणात चिंता वा शोक करणे.
- रोगामुळे वजन कमी होणे.
- मल-मूत्रादी नैसर्गिक वेग धरून ठेवणे.
- शरीरात आमदोष साठणे.
- मार लागणे.
- उपवास करणे.
- हृदय, मेंदू व बस्ती (किडनी व युरिनरी ब्लॅडर) या मर्मस्थानांमध्ये बिघाड होणे.
- हत्ती, घोडा, गाडी, विमान वगैरेंतून वेगाने प्रवास करणे.

या सर्व कारणांमुळे कुपित झालेला वातदोष शरीरातील स्रोतसांचा आश्रय घेतो आणि शरीरात एखाद्या ठिकाणी किंवा संपूर्ण शरीरात अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करतो.

वातव्याधी होण्यापूर्वी शरीरावर दिसणारी लक्षणे -
ज्या प्रकारचा वातव्याधी होणार असेल त्याचीच लक्षणे कमी प्रमाणात दिसू लागतात. उदा. कंपवात हा वातव्याधी होणार असला तर अगोदर लिहिताना हात कापणे, बारीकशी गोष्ट करताना हात थरथरणे अशी लक्षणे दिसू लागतात. ही वातरोगाची सूचक लक्षणे सुद्धा कमी-जास्ती होत राहतात. वाताची तीव्रता कमी झाली की शरीरात हलकेपणा येतो, मात्र वात वाढला तर पुन्हा पूर्वरूपे दिसू लागतात.

वातदोषाच्या असंतुलनामुळे अनेक रोग होऊ शकतात. या रोगांची माहिती आपण घेणार आहोतच, त्यापूर्वी वात-असंतुलनामुळे दिसणारी सामान्य लक्षणे काय असतात हे पाहू या.

संकोचः पर्वणां स्तम्भो भोऽस्थ्नां पर्वणामपि ।
रोमहर्षः प्रलापश्‍च पाणिपृष्ठशिरोग्रहः ।।
खाञ्ज......पुाल्यकुब्जत्वं शोथो।ऽऽनामनिदद्रता ।
गर्भशुक्ररजोनांशः स्पदनं गांत्रसुप्तता ।।
शिरोनासाक्षिजत्रूणां ग्रीवायाश्‍चापि हुण्डनम्‌ ।
स्तोदोऽर्तिराक्षेपो मुहुश्‍चायास एव च ।।...माधवनिदान


- हाता-पायाची बोटे आखडतात, हात बंद-उघड होऊ शकत नाहीत.
- हाडांमध्ये तीव्र वेदना होतात, बोटांमध्ये तीव्र वेदना होतात.
- अंगावर अकारण काटा येतो.
- अकारण बडबड केली जाते.
- पाय, पाठ व डोके आखडते.
- पाठीला कुबड येते.
- मनुष्य चालण्यास असमर्थ होतो.
- अंगावर सूज येते.
- झोप कमी येते.
- गर्भधारणा होण्यास त्रास होतो किंवा झालेली गर्भधारणा टिकत नाही.
- पुरुषांमध्ये पुनरुत्पादनाची शक्‍ती कमी होते.
- स्त्रीमध्ये रजःप्रवृत्ती कमी किंवा अकाली थांबते.
- संपूर्ण शरीरात किंवा शरीराच्या एका भागात कंप होऊ लागतो, तसेच बधिरपणा येतो.
- मान ताठ राहत नाही, डोक्‍यात तीव्र वेदना होतात.
- गंधज्ञानाची क्षमता कमी वा नष्ट होते.
- डोळे बारीक होतात, छाती-मानेतही जखडल्यासारखे वाटते.
- सर्व अंगात वेदना होतात, अस्वस्थता प्रतीत होते.

वातदोषाचे वैशिष्ट्य असे, की तो कारणानुसार आणि स्थानानुसार अनेक लक्षणे, अनेक रोग उत्पन्न करू शकतो. उदा. वातदोष त्वचेच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर त्वचा कोरडी होऊन भेगा पडू शकतात. सांध्यांच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर सांधे आखडू शकतात, नसांच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर बधिरपणा येऊ शकतो वगैरे. याविषयीची अधिक माहिती आपण पुढच्या वेळी पाहणार आहोत.                        

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Friday, January 22, 2010

पाठ दुखणे

पाठीच्या आजारात पाठ दुखणे सहज समजू शकते; परंतु शरीराच्या अन्य भागांतील आजारांमुळे व अनेकदा मानसिक अस्वास्थ्यानेदेखील पाठ दुखते.

पाठ दुखण्याचा अनुभव नसणारी व्यक्ती विरळाच असेल. पाठ दुखण्याची कारणे बरीच असू शकतात. पाठीच्या आजारात पाठ दुखणे सहज समजू शकते; परंतु, शरीराच्या अन्य भागातील आजारांमुळे व अनेकदा मानसिक अस्वास्थ्यानेदेखील पाठ दुखते.

रुग्णाच्या तक्रारी लक्ष देऊन ऐकणे व काळजीपूर्वक शरीर तपासणे, याला पर्याय नसतो. केवळ तपासण्या करून पाठदुखीचे कारण शोधता येत नाही. कारण न समजता केलेले उपाय केवळ वाया जातात एवढेच नाही, महत्त्वाचा वेळ वाया जातो. या वेळात मूळ आजार वाढत जातो आणि नको असणाऱ्या उपचारांचे अपाय होतात. अनावश्‍यक तपासण्यांचे खर्चही होतात, ते वेगळेच. सर्वप्रथम रुग्णाची सर्वसाधारण प्रकृती कशी आहे, हे समजणे आवश्‍यक आहे. रुग्णाचे वजन कमी होत चालले आहे का, रुग्णाला ताप येतो आहे का, रात्री घाम सुटतो का, हे समजून घ्यावे. ही लक्षणे क्षयरोगाची (Tuberculosis) असू शकतात. पाठ एकाच ठिकाणी सतत दुखत राहणे, हे लक्षण पाठीच्या मणक्‍यातील विकाराचे असते. (हाडांचा क्षयरोग अथवा कर्करोग).

रुग्णाला विशेषतः पुरुषांना लघवी करताना काही त्रास होत आहे का, हे विचारले गेलेच पाहिजे. 55 वर्षांपुढील पुरुषांना आयुष्यात प्रथम पाठदुखी सुरू झाली, दोन-तीन आठवडे टिकली, तर पुरस्त ग्रंथी (Prostates) चा कर्करोग असण्याची शक्‍यता मोठी असते. दोन मणक्‍यांतील चकत्यांचे आजार सहसा लहान वयात सुरू होतात. पुढे ते वाढतात व कमरेपासून घोट्यापर्यंत दुखणे (सायाटिका) सुरू होते. 60 वर्षांनंतरच्या स्त्रियांमध्ये हाडे पोकळ होण्याचा विकार अनेकांना होतो. अशी पोकळ हाडे क्षुल्लक कारणांनी मोडतात. एका सर्वेक्षणानुसार भारतात 60 वर्षांनंतर प्रत्येक तीन स्त्रियांत एका स्त्रीचे हाड या कारणाने (ऑस्टियोपोरोसिस osteoporosis) मोडते.

मनगटाजवळ, खुब्यात आणि पाठीच्या मणक्‍यात असा हाड मोडण्याचा संभव मोठा असतो. पाठीच्या मणक्‍याचे हाड मोडल्यानंतर मणका पिचतो व पाठीला बाक येतो (कुबडेपण). पाठीच्या कण्यात झालेल्या कोणत्याही आजाराने पाठीच्या मणक्‍याची हालचाल मोकळी होऊ शकत नाही. पुढे किंवा मागे वाकणे, उभ्याने पाठ फिरवून मान व खांदे फिरविणे कठीण होते. पाठीच्या कण्याच्या काही आजारांत पाठीची कोणतीच हालचाल होत नाही. आपल्या श्‍वसनाच्या क्रियेत फासळ्यांची हालचाल महत्त्वाची असते. पाठीच्या कण्याच्या आजारांत (अँकिलोझिंग स्पॉंडिलायटिस Ankylosing spondylitis) पाठीच्या कण्यावर टेकलेल्या फासळ्या हलू शकत नाहीत. अशा व्यक्तींनी दीर्घ श्‍वास घेतला तरी छाती फारशी फुगत नाही. चांगल्या प्रकृतीतील व्यक्तीची छाती किमान पाच सेंटिमीटर्स फुगावी. अँकिलोझिंग स्पॉंडिलायटिसच्या रुग्णाची एक सेंटिमीटरसुद्धा छाती फुगत नाही. या साध्या तपासणीने निदान करता येते. हातापायांच्या शिरांच्या तपासणीतून मज्जारज्जूतून पायात जाणाऱ्या शिरांवर दाब येत असल्याचे सहज कळू शकते.

जेव्हा रुग्णांच्या तक्रारी समजून व शरीराची काळजीपूर्वक तपासणी करून आजार कोठे असेल, याचा अंदाज बांधला जातो, तेव्हा पुढच्या तपासण्यांची योजना आखता येते. साध्या रक्त-लघवी-क्ष-किरणाचे फोटो इथपासून विविध प्रकारचे स्कॅन्स व बायॉप्सीपर्यंत (तुकडा काढून तपासणी) तपासण्या करता येतात.

कोणती तपासणी आवश्‍यक आहे, हे आपले डॉक्‍टर ठरवू शकतात. ज्या तपासण्या आवश्‍यक असतात, त्यांना पर्याय नसतो. कधी कधी सुरवातीच्या काळात क्ष-किरणांनी काढलेल्या फोटोत आजार दिसत नाही. मग काही दिवसांनी परत काढलेल्या फोटोत दिसतो. कोणता तपास केव्हा करावा, हे त्या विषयातील ज्ञान व अनुभव असणारी व्यक्तीच ठरवू शकते.

पाठीच्या कण्याचे आजार प्रथम शोधावे लागतात. ते नसल्यास शरीराच्या इतर भागांतील दोष पाहावे लागतात. हृदयविकारात कधी कधी छातीत दुखण्याबरोबर किंवा ऐवजी पाठीत दुखते व रुग्णाचा गैरसमज होतो. अन्ननलिकेच्या व महारोहिणीच्या आजारातदेखील पाठ दुखते. पोटात असणाऱ्या स्वादुपिंडांच्या आजारांत सुरवात पाठ दुखण्याने होते. स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या आजारात कंबर दुखण्याचे प्रमाण मोठे असते. अशा सर्व आजारांत पाठीच्या कण्याच्या हालचाली मोकळ्या होत असतात. त्यामुळे शारीरिक तपासणीत या आजारांचा संशय येतो.

दीर्घ काळ पाठ दुखण्यामागे मानसिक कारणे असू शकतात. तथापि, शरीरात एकाच ठिकाणी वेदना होत राहणे, हे सहसा मानसिक नसते. सोमॅटायझेशन (कनव्हर्जन, हिस्टेरिया) अशा आजारांत आंधळेपण, अंगावरून वारे जाणे, फिट्‌स येणे असे त्रास जास्त प्रमाणात होतात. कोणताही आजार मानसिक आहे, हे ठरविणे मानसविकारतज्ज्ञ (सायकियाट्रिस्ट) यांचे काम असते. शारीरिक आजार आपल्याला सापडला नाही म्हणून रुग्णाचा आजार मानसिक आहे, असे समजण्याची चूक अनेकदा होऊ शकते. एकाच जागी सातत्याने होणारी वेदना मानसिक असण्याची शक्‍यता नसते, हे ध्यानात ठेवले पाहिजे.

पाठदुखीचे सर्वांत महत्त्वाचे कारण, पाठीच्या स्नायूंचा थकवा, हे असते. नियमाने पाठीचे व्यायाम करावेत. बसताना पाठ सरळ ठेवून बसावे. पोक काढून बसणे किंवा उभे राहणे या सवयी कटाक्षाने सोडाव्यात. हे अशा पाठदुखीवर प्रभावी उपचार होत.Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Tuesday, October 14, 2008

नका देऊ वाताला संधी!!

नका देऊ वाताला संधी!!


(डॉ. श्री बालाजी तांबे)
अनेक जण नाना तऱ्हेचे चटपटीत, तीक्ष्ण, पित्तकारक पदार्थ सेवन करतात, सारखे चिडतात, रागावतात. अशा रीतीने शरीरात उष्णता तयार केली, जागरणे केली, की तयार झालेला अग्नी वाताला बोलावतो आणि वात व अग्नी यांचा संगम झाला की शरीरातील जीवनसत्त्वे वाळू लागतात, स्नायू कडक होतात, सांध्यात असलेले वंगण द्रव्य कमी होते वा वाळून जाते आणि वाढलेला वात संधिवात या स्वरूपात त्रास देऊ लागतो. ........
भारतीय परंपरेत, नव्हे तर एकूणच प्राणिमात्रांसाठी "संधि' म्हणजे जोडणे या गोष्टीला फार महत्त्व असते. त्यातूनच सध्या विकसित झालेली स्त्री-पुरुष विवाह परंपरा आपल्याला दिसून येते. आधुनिक काळात म्हणतात कोलॅबरेशन, एखाद्या भारतीय कंपनीला परदेशी कंपनीशी वा परदेशी कंपनीला भारतीय कंपनीशी जोडणे, नेहमी फायद्याचे ठरते. जोडणे व तोडणे हा फक्‍त दिशाबदल असतो. वारा हा अतिचंचल असतो, क्षणाक्षणाला दिशा बदलू शकतो. आवश्‍यकतेनुसार काही वेळा जोडताना आनंद वाटतो तर काही वेळा तोडताना. संस्कृत भाषेत, जी भारताची प्राचीन व मूळची भाषा आहे, संधी खूप महत्त्वाचा आहे. या संधिकरणाच्या गंमतीमुळे भाषेत आटोपशीरपणा तर येतोच, पण त्यात काव्यात्मकताही येते. संधीवरून उच्चार जमला तर खूप आनंद घेता येतो. मात्र, संस्कृतातील या संधीला बरेच जण घाबरतात. संधी सोडवावा तर व्याकरण कळत नाही आणि संधीचा उच्चार करावा तर जीभ वळत नाही. संधीची महत्ता अशी असली तरी, संधिवात म्हटला की हमखास डोकेदुखी!

संधिवातात वाताचा संधी कोणाशी झाला आहे हा शब्द अध्याहृत आहे. तो शोधून काढायचा असतो. दोन हाडे ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी संधिवात दिसत असला तरी तो केवळ दोन हाडांच्या ठिकाणी असल्याने त्याला संधिवात म्हटलेले नाही. एकूण बघता असे लक्षात येते की संधिवात पूर्ण शरीरव्याप्त आहे. हाडांच्या ठिकाणी संधिवात प्रकट होत असला ती संधिवात ज्या आमदोषामुळे होतो तो आमदोष शरीरव्याप्त असतो.

निसर्गाचे चक्र पुढे चालण्यासाठी परमेश्‍वराने अनेक प्रकारच्या जोड्यांची योजना केली व अनेक प्रकारचे संधी केले. स्त्री-पुरुष हा एक त्यातलाच संधी. शरीर नीट चालावे म्हणूून अनेक प्रकारचे संधी केलेले सापडतात. मनगटात, कोपरात, मानेत, खांद्यात, कंबरेत, गुडघ्यात, पावलात वगैरे ठिकाणचे मोठे संधी दिसून येत असले तरीसुद्धा शरीरातील प्रत्येक स्नायू लवचिक असावा लागतो. संधिवातामुळे स्नायू जखडणे व कडक होणे हाही त्रास होऊ शकतो. वात म्हटला की तो वात आणतो व डोकेदुखी वाढवतो. एखादा मनुष्य फार बडबड करायला लागला तर आयुर्वेदाचा गंध नसणारी माणसेही उद्गारतात,""याने वात आणला''.

अति बडबड हे लक्षण वाताचे आहे हे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. कुठलाही त्रास हा बहुतेक वेळा वाताने होतो. कारण, वातामुळे हव्या त्या हालचाली होत नाहीत. नको त्या हालचाली अधिक होतात. वातामुळेच वेदना होतात अशा तऱ्हेने वात मनुष्याला नाना प्रकारे त्रास देत राहतो. तो संधिवाताच्या रूपाने प्रकट झाला तर मग बघायलाच नको. बऱ्याच वेळा अग्नी वाताचा मित्र बनूून त्याला मदत करतो. अनेक जण नाना तऱ्हेचे चटक- मटक, तीक्ष्ण, पित्तकारक पदार्थ सेवन करतात, सारखे चिडतात व रागावतात. रागावल्याने शरीरात किती कॅलरीज उष्णता उत्पन्न होत असेल याचे गणित करण्यास कॅलक्‍युलेटर पुरणार नाही. रागाने आतमध्ये डंख कोरला गेला तर द्वेषाच्या वा सूडाच्या रूपाने शरीरातील भट्टी कायमसाठी पेटती राहते. अशा रीतीने शरीरात उष्णता तयार केली, जागरणे केली, की तयार झालेला अग्नी वाताला बोलावतो आणि वात व अग्नी यांचा संगम झाला की शरीरातील जीवनसत्त्वे वाळू लागतात, स्नायू कडक होतात, सांध्यात असलेले वंगण द्रव्य कमी होते वा वाळून जाते आणि वाढलेला वात संधिवात या स्वरूपात त्रास देऊ लागतो.

कणिक मळता येत नाही, वेणी घालण्यासाठी खांदा उचलता येत नाही, हातात पेन धरता येत नाही, मान डगडगते, पाय हलतात, कंप जाणवतो अशी लक्षणे घेऊन संधिवाताचे रोगी येतात. संधिवाताने त्याच्या इतर भाऊबंदांना बोलावले तर पाय वाकडे होणे, हातापायाची बोटे वेडीवाकडी होणे असा त्रास होऊ लागतो. फार पूर्वी एक बाई माझ्याकडे आल्या व मला जेवणासाठी येण्याचा आग्रह करू लागल्या. त्यांची पुरणपोळी गावात वाखणण्यासारखी असे पण त्यांची बोटे वाकडी झाल्याने त्या पुरणपोळी करू शकत नव्हत्या. माझ्या इलाजाने त्यांची बोटे सरळ झाली म्हणून मी त्यांच्याकडे पुरणपोळीचे जेवण करण्यासाठी यावे असा त्यांचा आग्रह होता. असेच दुसरे एक गृहस्थ होते ज्यांच्या पत्नीची पालिताण्याचे दर्शन करण्याची फार इच्छा होती पण संधिवाताने ग्रासल्याने त्या त्यांच्या घरातून खाली येण्यासही अमसर्थ झाल्या होत्या. माझ्या उपचारांनी त्या पालिताण्याच्या दर्शनाला जाण्याइतपत बऱ्या झाल्याने त्यांच्या बरोबर मीही पालिताण्याला जावे असा त्यांचा आग्रह होता. मी त्यांना म्हटले,"" अशा तऱ्हेने मी रोज पुरणपोळ्या खाऊन पालिताणा वगैरे फिरायला लागलो तर दवाखान्यात कोण बसणार?'' सांगायचा हेतू असा की संधिवाताच्या बरोबरीने पुढे अनेक त्रास वाढू शकतात. संधिवात होऊ नये म्हणून आंबट, वातूळ पदार्थ खाणे टाळणे, शरीरातील आमाचा वेळच्या वेळी निचरा करणे. यासाठी पंचकर्मातील विरेचन, बस्तीएवढा उत्तम उपाय नाही. तसेच रोज सांध्यांना "संतुलन शांती तेला'सारख्या तेलाचा मसाज केला तर आमवाताचा, पर्यायाने संधिवाताचा त्रास होणार नाही.

- डॉ. श्री बालाजी तांबे
www.ayu.de

संधिवाताचे प्रकार

संधिवाताचे प्रकार


(डॉ. श्रीकांत वाघ)
ह्युमॅटॉलॉजीत संधिवाताचे निदान तसे सोपे असते. त्यासाठी रुग्णाची लक्षणे, इतिहास आणि सांधेदुखीचे स्वरूप एवढे नीट समजले की पुरे. प्रयोगशाळेच्या तपासण्यांची निदानासाठी फारशी आवश्‍यकता लागत नाही. त्यासाठी संधिवाताची वेगवेगळी स्वरूप लक्षात घेणे आवश्‍यक आहे. ही स्वरूप नीट लक्षात घेतली म्हणजे कोणत्या संधिवातासाठी तज्ज्ञांचा त्वरित सल्ला घेतला पाहिजे ते समजू शकेल. ........
आपल्या शरीरात सुमारे २०० पेक्षा अधिक सांधे आहेत. दोन हाडे एकत्र येतात तेथे सांधा बनतो. काही सांध्यांमध्ये हालचाल होत नाही. (स्थिर संधी), उदा. कवटीच्या हाडांचे सांधे; पण बहुतेक सांध्यांमध्ये काही हालचाल होते. असे सांधे मणक्‍यांमध्ये, बरगड्यांमध्ये आणि हातापायात असतात. हालचाल होणे हेच सांध्यांचे महत्त्वाचे काम आहे. नुसते हाडावर हाड ठेवले तर हालचाल होऊ शकणार नाही. त्यासाठी दोन हाडांना जोडणारे एक वेष्टण (कॅप्सूल) असते. कॅप्सूलला बळकटी देण्यासाठी दोरखंडासारखी बंधने (लिगामेंट्‌स) असतात. त्यामुळे सांधे सैल होत नाहीत. सांध्यांची हालचाल स्नायूंमुळे होते. सांध्यातल्या दोनही हाडांवर अत्यंत चिवट आणि कणखर अशा चाकावरच्या टायरसारख्या कुर्चा (कार्टिलेज) असतात. कॅप्सूलच्या आत विशिष्ट प्रकारच्या पेशी (सायनोव्हियम) असतात. त्यातून अंड्याच्या पांढऱ्या बलकासारखा दिसणारा, वंगणासारखे काम करणारा संधिद्रव स्रवतो. हा संधिद्रव कुर्चांमध्ये स्पंजासारखा शोषला जातो. त्यामुळे हाडावर हाड घासत नाही. कुर्चेला संवेदना नसते; तसेच कुर्चा घासून कमी झाली तर पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. कुर्चेला संवेदनाही नसते. त्यामुळे सांध्यातले दुखणे हे बहुधा सायनोव्हियम, कॅप्सूल, लिगामेन्ट्‌स, स्नायू अथवा अस्थी यांपासूनच निर्माण झालेले असते. सांध्यांच्या कार्यप्रणालीवरूनही त्यांचे वेगवेगळे प्रकार दिसतात. खांद्यांपासून हाताच्या बोटांपर्यंतच्या सांध्यामध्ये हालचालींची विविधता दिसून येते. अनेक गुंतागुंतीच्या हालचाली करू शकणाऱ्या हातात, तर मनगटाच्या पुढे वीस-वीस सांध्यांची योजना आहे. मणक्‍यातले सांधे शरीराला स्थैर्य देऊन मानेच्या व कमरेच्या हालचाली घडवून आणतात, तर पायातले बळकट सांधे शरीराचा भार वाहत काम करत असतात.

सांध्यांच्या ठिकाणी दुखले, की आपण त्याला संधिवात म्हणतो. यातच मानेचे, पाठीचे आणि कमरेचे दुखणेही येते. संधी म्हणजे सांधा. वात ही आयुर्वेदाची शास्त्रीय संज्ञा आहे. शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली घडवून आणणे, हे वाताचे प्रमुख कार्य आहे. सांधेदुखीमुळे हालचाली नीट होत नाहीत म्हणजेच वाताचे कार्य बिघडते. संधिगतवात असा आजारही आयुर्वेदात आहे. त्यावरूनच "संधिवात' हा शब्द मराठीत आला. यालाच इंग्रजीत "ह्युमॅटिझम' असे म्हणतात. "ह्युम' या ग्रीक शब्दाचा अर्थ प्रवाही किंवा वाहणारा. सूज येते ती अर्थातच द्रवामुळे; पण बोली भाषेत सुजेमुळे अथवा सूज नसतानाही जेव्हा वेदना होतात तेव्हा त्याला "ह्युमॅटिझम' असे म्हणतात. संधिवात हे एक लक्षण आहे. ते सुमारे शंभरेक वेगवेगळ्या आजारांमध्ये निर्माण होते. संधिवाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यांचे योग्य उपचार करणाऱ्या तज्ज्ञांना "ह्युमॅटॉलॉजिस्ट' असे म्हणतात.

ह्युमॅटॉलॉजीत संधिवाताचे निदान तसे सोपे असते. त्यासाठी रुग्णाची लक्षणे, इतिहास आणि सांधेदुखीचे स्वरूप एवढे नीट समजले की पुरे. प्रयोगशाळेच्या तपासण्यांची निदानासाठी फारशी आवश्‍यकता लागत नाही. त्यासाठी संधिवाताची वेगवेगळी स्वरूप लक्षात घेणे आवश्‍यक आहे. ही स्वरूप नीट लक्षात घेतली म्हणजे कोणत्या संधिवातासाठी तज्ज्ञांचा त्वरित सल्ला घेतला पाहिजे ते समजू शकेल.

सांधेदुखी -
"मला संधिवात झाला आहे' असे सांगत अनेकदा रोगी येतात. सांध्यांचे दुखणे हे सांध्याच्या आतील आजारामुळे आहे की सांध्याबाहेरच्या स्नायू, लिगामेन्ट्‌स इत्यादींमुळे आहे, ते आधी समजले पाहिजे. यात टेनिस एल्‌बो (हाताच्या कोपराचे दुखणे), क्रोझन शोल्डर (खांदा दुखणे), पावले सपाट असल्याने दुखणे इत्यादी अनेक आजार येतात. त्यांना "सॉफ्ट टिश्‍यू ह्युमॅटिझम' म्हणतात. या सांध्याबाहेरच्या दुखणाचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे काम करताना आपण सांधा हलवला तर तो दुखतो; पण इतरांनी तो सांधा हलवला तर काही दुखत नाही. कधी कधी एकाच रोग्यामध्ये दोन तीन वेगवेगळ्या सांध्यांचे ठिकाणी अशी वेलवेगळी संधिबाह्य दुखणी असतात. या बहुतेक दुखण्यांमध्ये व्यायाम, विश्रांती, सांध्याचा योग्य वापर आणि क्वचित दुखणाऱ्या भागी स्टिरॉइड इंजेक्‍शन दिले की भागते.

काही पेशंटचे सांधे दुखण्याला कोणतेही शारीरिक कारण नसते. काहींचे पूर्ण हातपाय दुखतात, त्याला खरे तर संधिवात म्हणता येत नाही. शेवटी प्रत्येक वेदनेच्या मागे मन आहेच. अशा मानसिक वेदनांचे फायब्रोमायाल्जियाचे रोगी उगाचच एका डॉक्‍टरकडून दुसऱ्याकडे जात राहतात, औषधेही विनाकारण घेतली जातात. गुण मात्र कशानेच येत नाही. खरे तर व्यायाम, योगासने, मनाचे संतुलन आणि जीवनशैलीचे बदल हेच या दुखण्यात उपयोगी पडते.

हाडांच्या विरळपणाविषयी हल्ली जागरूकता वाढली आहे. अनेक शहरवासीयांना सूर्यप्रकाशाचा स्पर्शही होत नाही. त्यामुळे होणारी "ड' जीवनसत्त्वाची कमतरता; तसेच आहारातील कॅल्शिअमचा अपुरेपणा आणि व्यायामाचा अभाव ही हाडांच्या कमकुवतपणाची मुख्य कारणे. स्त्रियांमध्ये पाळी गेल्यानंतर आणि विशेषत- ऑपरेशनने गर्भपिशवी काढली असताना हाडे झपाट्याने विरळ होतात. या आजारात हाडांच्या दुखण्यासोबतच पाठदुखी, कंबरदुखी, मांड्यांच्या अशक्तपणामुळे उठता बसताना त्रास, वेडेवाकडे चालणे अशी वेगवेगळी संदिग्ध लक्षणे दिसतात. सहज पडून फ्रॅक्‍चर झाले तर हमखास हाडे विरळ समजावीत. व्यायाम, कॅल्शिअम आणि "ड' जीवनसत्त्व; तसेच काही औषधांनी हा आजार हळूहळू आटोक्‍यात येतो.

संधिवात -
आता संधिवाताकडे वळू. सांध्यांमधल्या कुर्चेच्या झिजेमुळे बहुधा "ऑस्टिओआरथ्रायटिस' नावाचा संधिवात होतो. ज्या सांध्यांना एकंदरच आयुष्यभर काम जास्त पडते त्यांना असा संधिवात होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यामुळे गुडघा, मानेचे आणि कंबरेचे मणके आणि बोटाच्या पुढच्या पेरांच्या सांध्यांमध्ये ऍस्टिओआरथ्रायटिस विशेष करून आढळतो. काही व्यवसायांमध्येही विशिष्ट सांध्यांना संधिवात होतो. (ड्रील मशिन चालवणाऱ्याचे हाताचे सांधे, बैठ्या कामामध्ये मानेचे दुखणे, खाली वाकून वजन उचलले की कंबरदुखी) जुने अपघात, ऑपरेशन, कमकुवत लिगामेंट्‌स; तसेच डायबेटिस, कुष्ठरोग इत्यादीतही ऑस्टिओआरथ्रायटिस होऊ शकतो. साधारणत- ही दुखणी बराच काळ हळूहळू वाढत जाणारी असतात. गुडघ्याचा संधिवात हा यातला महत्त्वाचा आजार. चालताना किंवा जिना चढता उतरताना गुडघा दुखणे, दोन पायांवर बसता न येणे अशी याची लक्षणे असतात. तो विशेषत- जास्त वजनाच्या लोकांमध्ये आढळतो. कारण गुडघाच त्यांचा भार वाहत असतो. झिजलेला कुर्चा पुन्हा भरून येत नाही. त्यामुळे गुडघ्यावरचा ताण टाळणे हाच त्यावरचा मुख्य उपाय आहे. त्यासाठी मांडी घालू नये, दोन पायांवर बसू नये, वजन कमी करावे, जमेल तितके चालावे आणि जरूर पडल्यास दुखणाऱ्या गुडघ्याच्या विरुद्ध हातात काठी घेऊन तीवर भार देत चालावे. दहा टक्के वजन कमी झाले तर पन्नास टक्के वेदना कमी होते. गुडघा सुजला तर तेथे इंजेक्‍शन देतात आणि फारच बिघडून वेदना असह्य होऊ लागल्या तर तो सांधा बदलतात. सांधा बदलण्याचे ऑपरेशन आवश्‍यक झाले तर उशीर करू नये. नाहीतर हालचाल कमी होऊन इतर बरेच उपद्रव होतात.

आमवात -
सुजेचे संधिवात हा खरा धोक्‍याचा कंदील आहे. कारण सांध्यातले सायनोव्हियम सुजले की त्यामुळे कुर्चा आणि हाडांना खड्डे पडून दोन-तीन महिन्यांतच सांध्यांचा नाश व्हायला सुरवात होते. त्यामुळे सुजेचा संधिवात त्वरित ओळखणे आणि लवकर इलाज करणे फार महत्त्वाचे आहे. लवकर इलाज झाले तर हा आमवात हमखास आटोक्‍यात येतो आणि सांधे पूर्ववत होऊ शकतात. सुजेच्या आणि झिजेच्या संधिवातात महत्त्वाचा फरक असा, की सुचेच्या संधिवाताचा सांधा सुजून रबरासारख्या लागतो. सूज ही सांध्याच्या सर्व बाजूंनी एकसारखी असते, हालचाल केली किंवा व्यायाम केला की दुखणे कमी होते आणि सकाळी अर्धाएक तासापेक्षा जास्त कडकपणा राहतो. याउलट झिजेच्या संधिवातात कडकपणा काही मिनिटांपुरताच असतो आणि व्यायामानंतर सांधा जास्त दुखतो. सुजेच्या संधिवातात ताप येणे, भूक मंदावणे, वजन घटणे अशी इतरही लक्षणे असू शकतात.

ह्युमॅटॉइड आरथ्रायटिस हे सुजेच्या संधिवाताचे उत्तम उदाहरण आपण त्याला आमवात म्हणू. या प्रकारच्या आमवातात हाताच्या पेरांमधले सांधे जसे मनगट, कोपरा, घोटा, पावलांचे सांधे अशा ठिकाणी विशेषत- सूज येते. सांधे उजवीकडे आणि डावीकडे असे एकाचवेळी एकासारखे सुजतात. सांधे लालसर आणि गरम असू शकतात. व्यायामाने बरे वाटते. सुजेविषयी अनिश्‍चितता असली तरी डॉपलर सोनोग्राफी किंवा एमआरआय तपासणीचा उपयोग होतो. रक्ताच्या ईएसआर किंवा सीआरपी या तापसण्यांनीही सूज ओळखता येते. ह्युमॅटॉइड फॅक्‍टर किंवा एसीसीपी या तपासण्या निदानास नेमकेपणा आणतात; तसेच त्यावरून आजाराच्या गंभीरतेचा अंदाज घेता येतो. ह्युमॅटॉइड संधिवातात हल्ली अत्यंत परिणामकारक औषधे उपलब्ध झाली आहेत. ती तज्ज्ञांच्या सल्ल्याने लवकरात लवकर वापरणे आवश्‍यक आहे.

आमवातातच लुपस, स्केरोडर्मा, व्हॅस्क्‍यूलायटिस असे गंभीर आजारही येतात. त्यांचे वेगळे स्वरूप ओळखणे फारच महत्त्वाचे आहे; परंतु बहुतेक वेळा ते साध्या तपासण्यांवरून ओळखू येऊ शकतात.

कमरेचा आमवात -
मणके संपतात तेथे माकड हाड ओटीपोटाच्या सापळ्याचा एक सांधा असतो. तेथे सुरू होणारी सूज हे ऍन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिसचे वैशिष्ट्य. त्यामुळे कमरेची हालचाल करताना दुखते. पाठीत विशेषत- सकाळी तासाभरापेक्षा जास्त कडकपणा राहतो. अगदी अंथरुणात वळतानासुद्धा कंबरदुखीने जाग येते. हळूहळू सगळे मणकेच कडक होतात. मानपाठ वळवता येत नाही. कुबड येते आणि श्‍वसनालाही त्रास होऊ शकतो. वेदनाशामक औषध घेतले की तात्पुरते बरे वाटते. याच आमवातात विशेषत- पायाचे मोठे सांधे सुजून लवकर खराब होतात. तरुण वयाच्या पुरुषांमध्ये होणाऱ्या या गंभीर आजारासाठी अलीकडे काही परिणामकारक औषधे उपलब्ध झाली आहेत; पण ती फारच महाग आहेत.

सोरियासिस, संग्रहणी आणि गुप्तरोगांमुळेही अशाप्रकारचा कमरेचा संधिवात होऊ शकतो. अर्थात, त्यांचे स्वरूप काहीसे वेगळे असते. सोरियासिस संधिवात त्वचेचा सोरियासिस नसतानाही होऊ शकतो. त्यात हाताच्या बोटांच्या पुढच्या पेराचे सांधे विशेषत- सुजतात. या सर्वंच संधिवातांचे यशस्वी उपचार करणे आता शक्‍य झाले आहे.

अचानक आलेली सांध्याची सूज -
वर उल्लेखलेले बहुतेक संधिवात प्रदीर्घकाळ चालणारे असतात. एखादा सांधा अचानक सुजून दुखू लागला तर सामान्यत- मार लागणे किंवा गाउट आणि सेप्टिक संधिवात ही मुख्य कारणे असतात.

गाउट हा चाळिशीच्या आसपासच्या विशेषत- लठ्ठ पुरुषांमध्ये होणारा आजार आहे. मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रियांना; तसेच मुलांना सामान्यत- गाउट होत नाही. शरीरात तयार होणाऱ्या युरिक ऍसिडचे स्फटिक सांध्यात जमून सूज उत्पन्न होते. थंडीच्या दिवसात विशेषत- रात्रीच्या मद्यपानासोबत सामिष जेवणानंतर पहाटे अचानक पायाचा अंगठा सुजतो, लाल आणि गरम होतो. तेथे अगदी विंचू चावल्यासारख्या वेदना होतात. टाच, घोटा, मनगट इत्यादी इतर सांधेही सुजू शकतात. वारंवार अशी सूज येत राहिली की या ऍसिडमुळे हाडांना खड्डे पडून सांध्याचा नाश होतो.

गाउट किंवा सेप्टिक संधिवातात सांध्यातले पाणी काढून प्रयोगशाळेत तपासणे अत्यावश्‍यक आहे. गाउटच्या ऍटॅकमध्ये सूज कमी करणारी औषधे वापरतात. वारंवार ऍटॅक येऊ लागले तरच ऍलोप्युरिनॉल वापरतात. सेप्टिक संधिवातात योग्य ती ऍन्टिबायॉटिक औषधे त्वरेने वापरणे आवश्‍यक आहे.

एकापेक्षा जास्त सांधे अचानक सुजले तर सामान्यत- चिकुनगुन्यासारखे न्हायरसमुळे होणारे संधिवात असतात. या संधिवाताची इतरही अनेक कारणे आहेत. त्यात कुष्ठरोग, टीबी, कॅन्सर, एड्‌स, सारकॉइड असे बरेच आजार येतात. अर्थात, त्यांच्या निदानासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

लहान मुलांचे संधिवात
१६ वर्षांपेक्षा लहान मुलांचे संधिवात ही एक विशेष समस्या आहे. मुलांमध्ये सांधेदुखीची सुमारे शंभरपेक्षा अधिक कारणे असतात. त्यातही अर्थात सुजेचे संधिवात महत्त्वाचे. कारण सांध्यांच्या जवळच हाडांची वाढणारी टोके असतात. लहान वयात सांधा बिघडला की वाढ खुंटते, ती मुले इतर मुलांबरोबर खेळू शकत नाहीत. त्यामुळे एकूणच व्यक्तिमत्त्वाचा विकास खुंटतो. लहान मुलांच्या संधिवाताचे एकूण सात उपप्रकार आहेत. ते सारे संधिवात मोठ्या माणसांसारखेच असले तरी लहान वयामुळे या संधिवाताकडे जास्त गांभीर्याने पाहणे आवश्‍यक आहे.

लहान वयात होणारा आणखी एक महत्त्वाचा संधिवात म्हणजे "ह्युमॅटिक ज्वर'. घशातल्या स्ट्रेप्टोकॉकस जंतूंविरोधी शरीरात जे प्रतिकण तयार होतात त्यामुळे एकानंतर एक सांधे सुजत जातात. या संधिवातात हृदयाच्या झडपा खराब होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे असे जंतू वारंवार उद्‌भवू नयेत म्हणून वयाच्या तीस-पस्तीस वर्षांपर्यंत पेनिसिलीन देतात.

सांधेदुखीची अनेक कारणे आपण पाहिली. त्यात विशेषत- सुजेचे संधिवात महत्त्वाचे. कारण त्यात योग्य उपायाने सांध्याचा नाश टाळता येतो. त्यासाठी सुजेच्या आणि झिजेच्या संधिवातातला फरक ओळखता येणे अत्यावश्‍यक आहे. २००२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पाहणीनुसार, नुकतीच पदवी घेतलेल्या ७८ टक्के डॉक्‍टरांनादेखील हा फरक उमजत नाही. त्यामुळे समाजातच या विषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे. तरच योग्य वेळी योग्य तो सल्ला घेऊन सांध्याची हानी टाळता येईल.

- डॉ. श्रीकांत वाघ, हृमॅटॉलॉजिस्ट (संधिवाततज्ज्ञ) पुणे

उपचार वातविकारांवर

उपचार वातविकारांवर


(डॉ. श्री बालाजी तांबे)
सर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो "संधिवात' असे मानले जात असले, तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. .......
ज्याच्या नावातच वात आहे, असा हा रोग वातविकारांपैकी एक आहे. सर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो संधिवात असे मानले जात असले तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. हे निदान करण्यासंदर्भात आयुर्वेदाने अत्यंत बारकाईने मार्गदर्शन केलेले आहे.

संधिगत वात -
हन्ति सन्धिगतः सन्धिन्शूलशोफौ करोति च ।
...योगरत्नाकर

जेव्हा सांध्यांमध्ये वातदोष वाढतो तेव्हा संधिवेदना व सूज निर्माण करतो.

एखादाच सांधा दुखणे व सगळे सांधे दुखणे असे याचे दोन प्रकार आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे एखादा सांधा दुखण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याचे दिसते. घोटा दुखणे वा गुडघे दुखणे, मान वा कंबर दुखणे अशा सर्व तक्रारी वाताने त्या त्या ठिकाणी बस्तान बसविल्याच्या निदर्शक असतात. आजकाल दिवसेंदिवस कमी वयातही असा त्रास होण्याचे प्रमाण वाढताना जाणवते आहे.

सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.

आमवात
युगपत्‌ कुपितौ अन्त त्रिकसन्धिप्रवेशकौ ।
स्तब्धं च कुरुतो गात्रनामवातः स उच्यते ।।
...माधवनिदान

जेव्हा आमदोष व वातदोष हो दोघे एकत्रित रीत्या कुपित होतात तेव्हा ज्या ज्या सांध्यात आमापाठोपाठ वातदोष जातो त्या त्या ठिकाणी हालचाल बंद करवतो, जखडण निर्माण करतो. या विकाराला आमवात असे म्हणतात.

संधिवातात सांध्यांमध्ये वातदोष असतोच पण आमवातामध्ये या दोघांच्या जोडीला आमही असतो. म्हणूनच आमवात बरा होण्यास दुष्कर व चिवट रोग समजला जातो. यात सुरुवातीला ताप येणे, अंग जड होणे, सांधे जखडणे अशी लक्षणे असतात. क्रमाक्रमाने जखडणाऱ्या सांध्यांची संख्या व तीव्रता वाढत जाते, सांध्यांवर सूज असणे, सांधा स्पर्शाला गरम लागणे, तीव्र वेदना होणे, स्पर्शही सहन न होणे ही आमवाताची लक्षणे असतात. आमवाताचे वैशिष्ट्य म्हणजे आम ज्या सांध्यात जाईल तेथे वेदना होतात. म्हणून बऱ्याचदा आमावातात फिरत्या वेदना असतात.

वातरक्‍त
क्रुद्धो रुद्धगतिर्मरुत्प्रकुपितेनास्रेण सन्दूष्यते ।
प्राक्‍पादौ तदनु प्रधावति वपुकण्ड्‌वार्तिसुप्त्यादयः ।।
...योगरत्नाकर

कुपित झालेला व अवरोध झालेला वायू दूषित रक्‍तासह मिळून प्रथम पायाचा आश्रय घेतो व नंतर संपूर्ण शरीरात धावतो. यामध्ये सांध्यांच्या ठिकाणी वेदना, खाज व बधिरता ही लक्षणे जाणवतात.

प्रत्यक्षातही पायाच्या किंवा हाताच्या अंगठ्यापासून याची सुरुवात होताना दिसते. सांध्यांच्या ठिकाणी लालसरपणा, वेदना, सूज ही लक्षणे दिसतात. क्रमाक्रमाने ही लक्षणे घोटा, गुडघा अशी वर वर सरकतात.

कोष्ठुकशीर्ष
वातशोणिजः शोथो जानुमध्ये महारुजः ।
ज्ञेयः क्रोष्टुकशीर्षस्तु स्थूलः क्रोष्टुकशीर्षवत्‌ ।।
... योगरत्नाकर

क्रोष्टुक म्हणजे कोल्हा. सूजेमुळे गुडघा कोल्ह्याच्या डोक्‍याप्रमाणे दिसू लागतो तो रोग म्हणजे क्रोष्टुकशीर्ष.
हा रोग फक्‍त गुडघ्यांपुरताच मर्यादित असतो व ह्यात रक्‍तधातूच्या जोडीने वात कुपित झालेला असतो.

वातकंटक
रक्‌पादे विषमे न्यस्ते श्रमाद्वा जायते यदा ।
वातेन गुल्फमाश्रित्य तमाहरर्वातकण्टकम्‌ ।।

पाऊल चुकीच्या पद्धतीने टाकल्याने किंवा अत्यधिक परिश्रम करण्याने जेव्हा वात गुल्फसंधीचा म्हणजे घोट्याचा आश्रय घेतो तेव्हा त्याला वातकंटक म्हणतात.

अंसशोष व अवबाहुक
अंसदेशे स्थितो वायुः शोषयित्वा अंसबन्धनम्‌ ।
सिराश्‍चा।क़ुंच्य तत्रस्थो जनयत्यवबाहुकम्‌ ।।
...योगरत्नाकर

अंस म्हणजे खांदा. खांद्यामध्ये जेव्हा वायू कुपित होतो व तेथील संधिबंधनांना सुकवतो तेव्हा त्याला अंसशोष म्हणतात. तर तिथल्या शिरा आखडल्यामुळे जेव्हा हात उचलता येत नाही तेव्हा त्याला अवबाहुक असे म्हणतात.आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये याप्रकारे सांधा सुकणे व जखडणे हे फक्‍त खांद्यांच्या संदर्भात सांगितले असले तरी ते इतर सांध्यांच्या बाबतीतही घडू शकते. विशेषतः आजकाल मांडी व कंबरेच्या सांध्यांच्या ठिकाणी रक्‍तप्रवाह पोचणे बंद होऊन तीव्र वेदना, चालता न येणे यासारखी लक्षणे असणारा रोग तरुण वयातच होताना दिसतो. हा यातलाच प्रकार समजावा लागतो. सर्व संधिवात विकारांवर दुःख कमी करण्याबरोबर रोग बरा व्हावा व झीज भरून निघावी म्हणून "संतुलन शांती तेल' वापरता येते, तसेच पाठीच्या मणक्‍यांची झीज, दोन मणक्‍यांमधील कूर्चा व नसा यांच्यासाठी "संतुलन कुंडलिनी तेल' वापरता येते.

मानदुखी, कंबरदुखी -
पाठीचे मणके हे सुद्धा छोटे छोटे सांधेच असतात. हे सांधे जोपर्यंत लवचिक असतात तोपर्यंत ठीक असते. पण, मणक्‍यांमध्ये वातदोष वाढला, लवचिकता कमी झाली तर दुखण्याची, जखडण्याची सुरुवात होते.

या सर्व वर्णनावरून एक लक्षात येईल की सांधा दुखतो या तक्रारीच्या मागे अनेक कारणे असू शकतात.
वातप्रकोप हे त्यातले सामान्य व प्रमुख कारण असले तरी त्याचा प्रकोप कशामुळे झाला, कोणासमवेत झाला याचीही दखल घेणे आवश्‍यक असते. प्रत्यक्ष उपचार करताना तर व्यक्‍तीची प्रकृती, तिचे राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयी, वय, कुटुंबातला इतिहास, ताकद, पचनशक्‍ती अशा अनेक लहानसहान गोष्टींचा विचार करावा लागतो व त्यानुसार नेमके उपचार योजावे लागतात.

---------------------------------------------------------------
वात नियंत्रित ठेवण्यासाठी
स्नेहन - बाहेरून करायचे स्नेहन म्हणजे वातशामक द्रव्यांनी तेल लावणे तर आतून करायचे स्नेहन म्हणजे घृृतपान. अंगाला "संतुलन अभ्यंग तेला'सारख्या तेलाने नियमित अभ्यंग करणे, सांध्यांना "संतुलन शांती तेला'सारखे आतपर्यंत जिरून सांध्यांना पूर्ववत वंगण देण्याची क्षमता असणारे तेल लावणे हे संधिवात होऊ नये म्हणून चांगले असते आणि संधिवात झालेल्यांनाही आवश्‍यक असते.
-स्वेदन - वातदोषाला शमविण्यासाठी स्वेदन म्हणजे शेकणे हाही उत्तम उपाय असतो. निर्गुडी, एरंड, शेवगा वगैरे वातशामक वनस्पतींच्या पानांचा शेक करण्याने वेदना शमतात, सूजही कमी होते. यासाठी तयार "संतुलन अस्थिसंधी पॅक'ही वापरता येतो. आमाचा संबंध असणाऱ्या संधिववेदनेमध्ये रुक्ष स्वेदन म्हणजे विटकरीच्या किंवा वाळूच्या साहाय्याने शेक करणे उपयुक्‍त असते.
-विरेचन - वाताला संतुलित करण्यासाठी हलके विरेचन हा उत्तम उपचार होय. स्नेहपान, बाष्पस्वेदन घेऊन शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन घेणे उत्तम असतेच पण घरच्या घरी पंधरा दिवसातून एकदा एरंडेल तेल घेऊन किंवा गंधर्वहरीतकी, योगसारक चूर्ण घेऊन पोट साफ करणे हेही वातासाठी चांगले असते. शरीराचे स्नेहन व्हावे व कोठासाफ व्हावा यासाठी पोळी किंवा भाकरी करताना त्यात चमचाभर एरंडेल तेलाचे मोहन टाकता येते. दिवसातून एकदा अशी गरम पोळी किंवा भाकरी खाण्याचा सर्व प्रकारच्या सांधेदुखीवर चांगला उपयोग होताना दिसतो.
-बस्ती - वातावरचा हुकुमी उपचार म्हणजे बस्ती. दशमूलासारख्या वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाची बस्ती घेणे सर्व सांधेदुखीवर उत्तम असते. अशी आयुर्वेदिक बस्ती पोट साफ होण्यासाठी नाही तर वातशमन करणारी असते. वैद्यांच्या मार्गदर्शनाने अशी बस्ती घेता येते. तसेच घरच्या घरीही तयार तेलाच्या पाऊचची बस्ती घेता येते. उदा. संतुलन आयुर्वेद सॅनबस्ती

वातशामक औषध म्हणूून योगराजगुग्गुळ, वातबल गोळ्या, गोक्षुरादी चूर्ण. दशमूलारिष्ट, महारास्नादि काढा पंचतिक्‍तघृत वगैरे योग घेता येतात. मात्र, त्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घेणे अधिक सयुक्‍तिक.

---------------------------------------------------------------
वातव्याधीसाठी पथ्यापथ्य
-पथ्य - तांदूळ, गहू, कुळीथ, पचतील एवढ्या प्रमाणात उडीद, परवर, शेवगा, लसूण, बोर, डाळिंब, मनुका, खडीसाखर, तूप, दूध, मनुका, सैंधव मीठ
-अपथ्य - रुक्ष धान्ये म्हणजे जव, नाचणी वगैरे; जड कडधान्ये (पावटा, चवळी, हरबरा, वाटाणा वगैरे); कडू व तिखट चवीचे पदार्थ, प्रवास, जागरण, नैसर्गिक वेगांचा अवरोध, अधिक परिश्रम, उपवास, अति मैथुन, चिंता.
---------------------------------------------------------------
सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.
---------------------------------------------------------------
डॉ. श्री बालाजी तांबे यांच्याशी संपर्कासाठी टाईप करा fdoc आणि पाठवा 54321 वर
---------------------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे

Thursday, May 1, 2008

दूर ठेवा संधिवात

दूर ठेवा संधिवात

(वैद्य मीरा ठाकूर, आयुर्वेदतज्ज्ञ, पुणे)
उतारवयात हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधे दुखी सुरू होणे हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मात्र, जीवनशैलीतील काही मोजके बदल, आहारावरील नियंत्रण आणि नियमित व्यायाम याच्या योगाने संधीवात दूर ठेवता येऊ शकतो.
तहान, भूक, झोप या शरीराच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत, त्याप्रमाणेच वृद्धत्व हीसुद्धा निसर्गचक्रातील एक अवस्था आहे. या काळात शरीरात नवीन काही तयार होत तर नाही, पण आहे त्याच शरीरातील अवयवांची आणि त्यांच्या क्रियांची झीज व्हायला लागते. या झिजेच्या प्रक्रियेत एक प्रमुख अवयव चाळिशीनंतर झिजायला लागतो, तो म्हणजे हाडे. आणि त्यामुळे होते वेगवेगळ्या प्रकारची सांधेदुखी किंवा संधिवात.

डोक्‍यापासून पायांच्या बोटांपर्यंत जीभ सोडून सर्वत्र हाडांचा सापळा असतो. या हाडांमुळेच आपल्या शरीराला आकार येतो. आपल्या हालचालींना सुलभता येते. मानेपासून कंबरेपर्यंत असलेला पाठीचा कणा किंवा मेरुदंड ही तेहतीस मणक्‍यांची माळ असून, जीवनाचा आधार आहे. त्याच्याभोवती पाठ म्हणजेच स्नायूंची एक भक्कम भिंत आहे. दोन मणक्‍यांमध्ये कुर्चा किंवा डिस्क असतात. या कुर्चा गादीसारख्या, पण लवचिक असतात. त्यामुळे हालचालींच्या वेळी मणक्‍यांना बसणारे धक्के या कुर्चा शोषून घेऊन दोन मणक्‍यांत घर्षण होऊ देत नाहीत.

दुसरा शरीरातील महत्त्वाचा सांधा म्हणजे गुडघा. हासुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी आणि संधिबंधांनी तयार होतो. आपल्याकडे भारतात आपण गुडघ्याचा वापर जरा जास्तच करतो. मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे, नमाजाला बसणे या आणि अशा अनेक क्रियांमुळे गुडघ्यांच्या हालचाली अधिक होऊन तेथील हाडे झिजणे, तेथील वंगण कमी होणे, किंवा अतिउष्णतेमुळे गुडघ्याला सूज येते.

शरीरातील प्रत्येक सांध्यातील हाडाचे, त्यातील संधिबंध स्नायू यांचे स्वतंत्र महत्त्व आहे. जेव्हा आपण दैनंदिन जीवनात सुरळीतपणे त्याचा वापर करत असतो तेव्हा आपल्याला त्या कशाचेच महत्त्व कळत नाही, पण जेव्हा सांध्यांतून, हाडांतून आवाज यायला लागतो, ते आपापली कामे नीट करेनाशी होतात तेव्हाच आपल्याला त्याचे महत्त्व समजायला लागते.

संधिवात होण्याची अनेक कारणे आहेत. काहींच्या हाडांत जन्मजात विकृती असते. सूज, दाह, जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याने अपघातामुळे हाडांना मार लागण्यामुळे किंवा तुटणे सरकण्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांनी हाडांना पोचणाऱ्या इजेमुळे, वयोमानानुसार मणक्‍यांची/ हाडांची होणारी झीज, शिवाय हाडे ठिसूळ होण्यामुळे, या आणि अशा अनेक कारणांमुळे संधिवात होत असतो.

आपल्याला ज्या सवयी लागलेल्या असतात त्यामुळे काही दुखण्यांना आपण स्वतःहूनच निमंत्रण देत असतो. उदाहरणार्थ- बसण्याची, उभे राहण्याची पद्धत, जास्त वजन असणाऱ्यांच्यासुद्धा शरीराचा भार गुडघ्यांवर पडल्यामुळे तेथील सांध्यांतील हाडांवर, संधिबंधांवर परिणाम होऊन पायांना बाक येणे, गुडघे दुखणे, सुजणे, हालचाली करताना त्रास होणे, खाली उठता-बसता न येणे, अशा तक्रारी सुरू होतात. वाकण्याची पद्धत, व्यायामाचा अभाव, जास्त वजन उचलणे, नैराश्‍य, मानसिक ताण, व्यावसायिक चिंता या सर्वांमुळेही सांधेदुखी आपल्या नकळत सुरू होऊन वाढत जाते.

पचनाच्या तक्रारींमुळे किंवा जास्त प्रमाणात अनियमित खाल्ल्याने, मलप्रवृत्तीच्या अनियमितपणामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शरीरात एक प्रकारची विषारांची किंवा आमाची निर्मिती होते. तो "आम' सांध्यांच्या ठिकाणी साठून वातदोषांच्या साह्याने तेथे विकृती निर्माण करून आमवाताची सुरवात होते. तसेच स्त्रियांच्या रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात जे काही अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावात बदल होतात त्यामुळे वजन वाढते. हाडे झिजायचे प्रमाणही या काळात अधिक असल्याने संधिवात या वयात सुरू होतो.

पाठदुखी, कंबरदुखी किंवा इतर सांधे दुखण्याचा अनुभव जरी प्रत्येकानेच कधी ना कधी घेतला असला, तरी दुखण्याची तीव्रता वाढणे, हातापायांत जडपणा किंवा बधिरपणा येणे, मुंग्या येणे, आग आग होणे, स्नायू कडक होणे, पायांत गोळे येणे, शरीर एका बाजूला कलणे, लघवी आणि शौचावर नियंत्रण न राहणे, तसेच खाली बसणे, वाकणे या क्रियांच्या वेळी दुखण्याची तीव्रता वाढू लागली की उपचार करण्याची वेळ आली आहे, असे समजायला हरकत नाही. ती म्हणजे.

आयुर्वेदानुसार अस्थिधातूची निर्मिती ही वातदोषापासून होते. जेव्हा एखाद्या हाडाच्या ठिकाणी विकृती निर्माण होते तेव्हा त्या ठिकाणी वातप्रकोप होतो आणि वातवृद्धीचे लक्षण म्हणून तेथे शूल किंवा दुखणे सुरू होते. आपल्या शरीराची व्याख्या "शीर्यते इति शरीरम्‌।' म्हणजे ज्याची झीज होते ते शरीर, अशी केलेली आहे. झीज होण्याची प्रक्रिया नैसर्गिक असली तरीसुद्धा ती योग्य क्रमाने होणे आवश्‍यक आहे. जर एखाद्याची लहान वयातच हाडे झिजायला लागली किंवा पुढे होणारी दुखणी व्हायला लागली की दुखणी दुःखाला कारण होतात.

रोजच्या जीवनात आपण जे खातो त्याचा उपचारासाठीही उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ - लवंगा, दालचिनी, जिरे, मोहरी, धने, सुंठ, पुदिना, मनुका. सांधेदुखीवर उपचार करताना पचन सुधारणे आवश्‍यक आहे, की ज्यामुळे शरीरात "आम'निर्मिती होणार नाही. तसेच शरीरात विकृत वातनिर्मिती थांबवून त्या वातावर नियंत्रण ठेवण्यासाठी एखादा दिवस पूर्ण उपवास, लंघन करणे उपयोगी ठरू शकते; पण डायबेटिस, ब्लडप्रेशरसारखे आजार असतील, इतर काही औषधे चालू असतील तर वैद्यकीय सल्ल्याने लंघन करावे.

दोन-तीन लसणीच्या पाकळ्या तुपावर किंवा एरंडेलावर परतून दिवसातून एकदा, असे दोन- तीन महिने खाव्यात. रोज रात्री झोपताना सुंठीच्या काढ्याबरोबर एरंडेल आपल्या कोठ्यानुसार व वैद्यकीय सल्ल्याने घेणे. आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा संधिवातासाठी खूप उपयोगी पडते. यात स्नेहन-स्वेदनपूर्वक बस्तिचिकित्सा, रक्तमोक्षणासारखी चिकित्सा केली जाते.

स्नेहन - यात स्नेहन/मसाज हा विशिष्ट औषधी तेलाने दुखणाऱ्या सांध्याला विशिष्ट पद्धतीने करावा. हा तज्ज्ञ व्यक्तींकडूनच करून घ्यावा. सांध्याच्या रचनेनुसार मसाज करण्याची दिशा ठरते. यासाठी विषगर्भ तेल, सहचरादी, प्रसारणी, धान्वंतर तेल, चंदनबलालाक्षादी तेलांचा उपयोग होतो. दुखणाऱ्या सांध्यांबरोबरच सर्वांगाला मसाज केल्यास चांगलेच. मसाजामुळे अस्थिधातूतील वाताचे शमन होते. हाडांची झीज होत नाही. अस्थिसंधी, मांस, स्नायू यांचे पोषण होते. पर्यायाने दृढता वाढून तेथील दुखणे कमी होते, सूज कमी होते. हालचालींना सुलभता येते.

स्वेदन - विशिष्ट औषधी द्रव्यांची वाफ विशिष्ट पद्धतीने दुखणाऱ्या सांध्यांना देण्यात येते. उदाहरणार्थ - नाडीस्वेद, पिण्डस्वेद, वालुकापोट्टली स्वेद. जेव्हा एखाद्या हाडाला पोषणाची आवश्‍यकता ?सेल, तेथील रक्तपुरवठा सुरळीत करावयाचा असेल तेव्हा पिण्डस्वेद पत्रपोट्टली स्वेद करता येतो. यासाठी साठेसाठीचा भात, गाईचे दूध, गुळवेल, देवदार- निर्गुंडीसारखी औषधी द्रव्ये वापरली जातात. त्यांचा उपयोग हाडांची झीज कमी होण्यास आणि तेथील घनता वाढवण्यात होतो.

बस्ती - या स्नेहन-स्वेदनानंतर, म्हणजेच मसाज आणि शेकानंतर काही औषधी द्रव्यांच्या काढ्यांचा आणि औषधी तेलांचा बस्ती किंवा एनिमा दिला जातो. बस्तिचिकित्सा ही वातावरची श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. सांधेदुखीबरोबरच पचनाच्या तक्रारीसाठी वजन कमी करून पर्यायाने गुडघ्यांवरील भार कमी करण्यासाठी या उपचारांचा उपयोग होतो. या सर्व पंचकर्मांच्या क्रिया या तज्ज्ञ वैद्यांकडूनच करून घ्याव्यात.

याशिवाय औषधोपचारामध्ये काही गुग्गुळ कल्प- उदाहरणार्थ - लाक्षादिगुग्गुळ, त्रयोदशांग गुग्गुळ, सिंहनाद, महावातविध्वंस, काही बृहत्‌वातचिंतामणी, सुवर्णभूपतीसारखे सुवर्णकल्प वापरले जातात. ही औषधेही योग्य वैद्याकडून व त्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

आहारात जंक फूड उदा. पिझ्झा, पावभाजीसारखे पदार्थ नियमित घेऊ नयेत. नियमित दूध घ्यावे. कढीपत्ता, कडवे वाल, गाजर, बीट, दुधी भोपळा, मुळा, कोबी, पडवळ, दोडक्‍यासारख्या भाज्या, पालेभाज्यांचे सूप, नारळाचे पाणी घ्यावे. मुगाची खिचडी, नाचणीची भाकरी खावी. शिंगाड्याचे थालीपीठ, शिरा हे उपवासाला घ्यावे. जेवणात अतिशय तेलकट, मसालेदार पदार्थ वर्ज्य करावेत. मसाल्यांऐवजी धने, जिरे, बडीशेप, हिंग, आले, लसूण घालून स्वयंपाक करावा. फ्रिजमधील थंड पदार्थ, शिळे अन्न, जास्त प्रमाणात चहा, कॉफी, मद्य, तंबाखूसेवन करू नये. दैनंदिन जीवनातील असे काही फेरबदल, योग्य आणि नियमित आहार, व्यायाम आणि योग्य औषधोपचाराने संधिवात नक्कीच पळून जाईल.

ad