Friday, November 25, 2011

आग्र्याचा पेठा

डॉ. श्री बालाजी तांबे
शरीरातील कडकी, उष्णता हा आरोग्याचा मुख्य शत्रू. शरीरातील व पोटातील उष्णतेमुळे अनेक प्रकारचे रोग होतात. कोहळ्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला तर शरीरातील कडकी कमी होऊन शरीर थंड होते. कोहळा हा नुसताच थंड नसून शांतही असतो. म्हणूनच कोहळ्याचा उपयोग मानसिक रोगांमध्ये केलेला असावा. मनुष्यमात्राला हवी शांती. शांती म्हणजेच थंडपणा, शांती म्हणजेच वृत्तीरहित मन, शांती म्हणजेच आराम व समाधान. कुठल्याही प्रकारचा कितीही मानसिक ताण आला तरी जो मनुष्य शांत असतो तो सर्व आघात सहन करू शकतो. असा मनुष्य विश्‍वात घडणाऱ्या घटनांना किंवा त्या व्यक्‍तीच्या आयुष्यात घडणाऱ्या नको वाटणाऱ्या घटनांना सामोरे जाऊ शकतो किंवा त्यांचे निवारण करू शकतो.

कोठल्याही प्राण्याचे अंडे दृष्टी आकर्षित करून घेते, कारण त्याचा आकार. हा एक विशिष्ट आकार ज्याला भूमितीमध्ये पॅराबोलिक (अंडाकृती) म्हणतात, तो एक निसर्गाचा महत्त्वाचा आविष्कार आहे व तो सर्व ठिकाणी पाहायला मिळतो. एका टोकाला थोडासा निमुळता, तसेच गोल नाही व लांबटही नाही, अशा प्रकारे सर्व बाजूंनी कुठेही कोपरा नसलेला, वाहता वर्तुळाकार असा हा आकार. कोहळा हे असे एक फळ आहे की त्याचा आकार फारच सुंदर असतो, ज्याला संस्कृतमध्ये कूष्मांड (उष्णता नसलेले अंडे) व हिंदीमध्ये पेठा म्हणतात. तसेच त्याचे शरीराशी साधर्म्य असे, की कोहळ्यावर एक प्रकारची लव असते, ती नंतर झडून जाते. कोहळ्याचा बाहेरून रंग पांढरा म्हणावा की हिरवा म्हणावा कळत नाही, पांढरट-हिरवट असतो. कोहळ्याच्या आत जणू बर्फ भरलेला असतो. त्याची प्रचिती पेठा नावाची बर्फी खाताना येते. दाताने पेठा तोडताना पांढरा स्वच्छ बर्फाचा तुकडा तोडतो आहोत असा भास होतो. परंतु तो नुसताच रंगाला व स्पर्शाला बर्फासारखा नसून गुणांनी अत्यंत थंड असतो. कोहळा शीतवीर्य व वीर्यवर्धक असतो. बदाम हे छोटेसे फळ असून त्यात ओलावा कमी व तेल अधिक असते, बदाम स्पर्शाला कठीण, फोडायला कडक व वीर्यवर्धक असतो. पण बदाम सर्वांनाच परवडतो असे नाही, कोहळा मात्र सर्वांना परवडतो.

शरीरातील कडकी, उष्णता हा आरोग्याचा मुख्य शत्रू. शरीरातील व पोटातील उष्णतेमुळे अनेक प्रकारचे रोग होतात. कोहळ्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला तर शरीरातील कडकी कमी होऊन शरीर थंड होते. कोहळ्याचा दुसरा एक महत्त्वाचा गुण म्हणजे तो वेलीवरून तोडल्यावर वर्षभर टिकू शकतो. आतून उष्णता असली की वस्तू लवकर खराब होते व तिची वाटचाल क्षरणाकडे वेगाने होते. कोहळा हा नुसताच थंड नसून शांतही असतो. म्हणूनच कोहळ्याचा उपयोग मानसिक रोगांमध्ये केलेला असावा. मनुष्यमात्राला हवी शांती. शांती म्हणजेच थंडपणा, शांती म्हणजेच वृत्तीरहित मन, शांती म्हणजेच आराम व समाधान. कुठल्याही प्रकारचा कितीही मानसिक ताण आला तरी जो मनुष्य शांत असतो तो सर्व आघात सहन करू शकतो. असा मनुष्य विश्‍वात घडणाऱ्या घटनांना किंवा त्या व्यक्‍तीच्या आयुष्यात घडणाऱ्या नको वाटणाऱ्या घटनांना सामोरे जाऊ शकतो किंवा त्यांचे निवारण करू शकतो. मनुष्य उष्ण प्रकृतीचा, गरम डोक्‍याचा, पित्तकर स्वभावाचा असला तर तो चिडचिड करतो, लगेच कावतो, ओरडतो, रागावतो, मारामारीपर्यंतही पोचू शकतो. कोहळ्याची बरोबरी आतून शांत असलेल्या व्यक्‍तीशी केली तर सर्व दुष्ट शक्‍तींना सामोरे जायची ताकद कोहळ्यात कशी असते हे समजते. म्हणूनच भारतीय परंपरेत घराबाहेर कोहळा लटकवून ठेवण्याची पद्धत दिसते. यामुळे बाहेरून येणारी वाईट दृष्टी, वाईट शक्‍ती असे अनाकलनीय अदृष्ट आघात कोहळ्यावर पडल्यावर कोहळा त्यांना निवृत्त करू शकतो, त्यांचा पराजय करू शकतो कारण तो स्वतः आत शांत व प्रेमाचा ओलावा धरून असतो. कारागृहात असणाऱ्या कैद्यांना शिक्षा करत असताना ती शिक्षा त्याला न होता त्याच्या दुर्बुद्धीला व्हावी व दुर्बुद्धी निघून जावी तसेच दुष्ट शक्‍तीमधील दुष्टत्वाचे अस्तित्व विरून जावे हाच उद्देश असतो. दुष्टपणा ह्या संकल्पनेत दुसऱ्याचे अधिकार बळकवणे अभिप्रेत असते, त्यामुळे सर्व दुष्ट शक्‍तींना प्रलोभन दाखवून गप्प करता येते किंवा नष्ट करता येते किंवा त्यांच्यात बदल घडविता येतो. प्राण व जीवन हे सर्वांना प्रिय असते व सर्वांनाच आवश्‍यक असते. त्यासाठी दुष्ट मनुष्य सूड म्हणून एखाद्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो, तशा दुष्ट शक्‍ती पण कुठल्यातरी जिवंत प्राण्याचा बळी मागत असतात. त्यांना बळी तर द्यायचा नाही, पण त्यांची इच्छा पूर्ण करून त्यांच्यातील दुष्टपणा घालवायचा ह्या उद्देशाने कुठलेही चांगले कृत्य करत असताना विघ्न टाळण्यासाठी भारतीय परंपरेत बळी देण्याची प्रथा सुरू झालेली आहे. हा बळी प्रत्यक्ष प्राण्याचा न देता कोहळ्याचा बळी देण्याचे शास्त्र शोधून काढले असावे. सुरुवातीला कोहळा व दुष्ट शक्‍ती ह्यांच्यात साम्य दिसावे व आकर्षण वाटावे म्हणून कापलेल्या कोहळ्यावर लाल गुलाल टाकून वर उडदाचे काही दाणे वगैरे टाकायची पद्धत ठेवली, जेणेकरून दुष्ट शक्‍ती कोहळ्याकडे आकर्षित होऊन त्या दुष्ट शक्‍तीचे तामसिकत्व कोहळ्याच्या सात्त्विकतेत विसर्जित होऊन जाईल. अर्थात काही तामसिक माणसे प्रत्यक्ष प्राण्यांचा बळी देण्यात समाधान मानत असली तरी गरज दुष्ट शक्‍तींचा बीमोड करणे हीच असते, त्यासाठी प्राणी मारण्याची आवश्‍यकता नाही. असा हा कोहळा, जो बळी देण्यापासून खाण्यापर्यंत उपयोगाला येतो, दारासमोर टांगता येतो, घरात ठेवता येतो, वेळप्रसंगी अन्न म्हणून उपयोगात आणता येतो. कोहळ्याचा रस, कोहळ्याची भाजी, कोहळ्याचे वाळवलेले सांडगे, कोहळ्याची मिठाई-पेठा अशा सर्व प्रकारे कोहळा हे बहुगुणी फळ उपयोगात आणले जाते. आग्र्याचा पेठा खूप प्रसिद्ध आहे. पूर्वी सैनिकांना टिकाऊ व ताकद वाढविणारी, सहज पचणारी मिठाई व अन्न म्हणून पेठा बनविला गेला. आग्र्याच्या मानसिक रुग्णांसाठी पण त्याचा उपयोग होत असावा. कोहळ्याचे उत्पादन करणे अत्यंत सोपे आहे. चांगल्या प्रकारे शेती केली तर एका वेलीवर 30-40 कोहळे येऊ शकतात. कोहळ्याची कीर्ती पाहून त्याचा उपचारात वापर केल्याने अनेक रुग्णांना जीवदान मिळालेले आहे. Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad