Saturday, March 6, 2010

विसरणे


डॉ. ह. वि. सरदेसाई

साचविलेल्या अनुभवाची पुनःपुन्हा पुनरावृत्ती करण्याने साठवणे टिकते व पुनरावृत्ती सहज होते. असे केले गेले नाही, तर पुनरावृत्ती कठीण होते. जी गोष्ट आपल्याला आठवणे आवश्‍यक आहे तिचे स्मरण रोज करणेच इष्ट.


आलेला अनुभव साचविणे आणि त्याची पुन्हा जाणीव करता येणे असे स्मृतीचे स्वरूप असते. अनुभवाची आठवण न होणे म्हणजे विस्मृती, विसरणे. अनुभव आपल्या ज्ञानेंद्रियांतून मेंदूकडे जातात. स्पर्श, चव, दृष्टी, ऐकणे आणि वास या संवेदना आपल्या अनुभवाला पायाभूत असतात. दोन किंवा अधिक संवेदना मिळून ओळख पटते. विशिष्ट रंग, रूप, वास, चव इत्यादींमुळे आपण हे फळ "आंबा' आहे असे ओळखू शकतो. ओळखलेल्या अनुभवाकडे आपले लक्ष गेले, तरच हा अनुभव आपल्या मेंदूत रेखाटला जातो. दररोज हजारो अनुभव विविध संवेदनांमार्फत मेंदूत जातात; पण ज्यांच्याकडे लक्ष गेले असेल तेवढेच अनुभव मेंदूत रेखाटले जातात (रजिस्ट्रेशन registration) रेखाटलेले अनुभव मेंदूच्या काही भागांत साचवून ठेवले जातात. एनकोडिंग (encoding) ऍण्ड रिटेंशन (retantion) ही साचविण्याची पद्धत विद्युत रासायनिक असते. अशा तऱ्हेच्या साठविलेल्या अनुभवाला पुनरावृत्त करणे (recal ) म्हणजे आठवणे, तो अनुभव जाणिवेच्या क्षेत्रात आणणे. रेखाटन, संचय आणि पुनरावृत्ती यांपैकी कशातही दोष झाला, तर विस्मृती होते.

संवेदनाच झाली नाही, तर रेखाटन होण्याचा प्रश्‍नच येणार नाही. संवेदना एकत्र येऊन ओळख पटली; परंतु तेथे लक्ष गेलेले नसले, तरी देखील रेखाटन होणार नाही. आपल्याला कोणीतरी एक काम सांगते; पण ऐकताना आपले तिकडे लक्ष नसेल, तर या संदेशाचे रेखाटन होणार नाही, झालेच तर फारच पुसट होईल. अभ्यास करताना आपण काय वाचतो आहोत इकडे ध्यान नसेल, तर विषय लक्षात राहणार नाही. आपले लक्ष जाणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. हेतुपुरस्सर लक्ष देणे म्हणजे मन एकाग्र करणे, याला प्रयत्न लागतात. या एकाग्र मनाला (consentration) मनाच्या चंचलतेला आवर घालण्याची सवय लावावी लागते (stop distraction) व (every thing eles)अशा मनाच्या एकाग्र स्थितीत रेखाटन योग्य होते. मनाची एकाग्रता कधी कधी सहजही होऊ शकते. एखाद्या विषयात रस असेल, तर मन एकाग्र होणे सोपे जाते. हा रस निर्माण करणे हे चांगल्या शिक्षकाचे प्रथम कर्तव्य आहे. रसाची निर्मिती विषयाचे मृदृत्व पटण्यावर असते. हा विषय समजून मला काय फायदा होणार आहे, हे समजण्याखेरीज विषयात मन रस घेऊ शकणार नाही. कुतूहल देखील रस निर्माण करू शकते. विषयाची आवड ही अनेक विषय शिकविणाऱ्या शिक्षक - शिक्षिकेबद्दलच्या भावनाचे रूपांतर असते. शिकविणारी व्यक्ती आवडली, तर विषयही आवडू लागतो. आपले ज्ञान, शिकविण्याचे कौशल्य आणि विद्यार्थ्यांबद्दल असणारी आत्मीयता या गुणांची विद्यार्थ्यांना आलेली प्रचिती, यावर आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात कसे राहतो हे ठरते, हे प्रत्येक शिक्षकाला समजले पाहिजे. शिक्षकाचे दर्शन देखील काही वयात महत्त्वाचे ठरते. कोणत्याही कारणाने अनुभव घेताना तिकडे लक्ष दिले गेले नाही, तर तो अनुभव आठवणीत साठला जाणार नाही. विस्मृती अटळ आहे.

मेंदूच्या अनेक भागांचा स्मरणशक्तीशी निकटचा संबंध असतो. या सर्व भागांचे कार्य चांगले चालले, तरच अनुभवाचे विद्युत रासायनिक स्वरूपात रूपांतर (एनकोडिंग) व साठवण (retantion) शक्‍य आहे. मेंदू हा विलक्षण अवयव आहे. त्यात १२०००००००००००० (बारा हजार कोटी) इतक्‍या पेशी असतात. प्रत्येक पेशीला योग्य प्राणवायू, ग्लुकोज, शर्करा, ओमेगा, ३ मेदाम्ले, सर्व जीवनसत्त्वे, विविध सार आणि अत्यावश्‍यक अमायनी आम्ले मिळावी लागतात. मेंदूला इजा होणे (हेड इन्जुरी head enjury), विविध रासायनिक द्रव्यांशी संपर्क येणे (उदाहरणार्थ- मद्यपान, कोकेन, गांजा, भांग, झोपेची औषधे इत्यादी), मेंदूला रक्तपुरवठा कमी पडणे (रोहिणी काठीण्य, आजार, धूम्रपान) मेंदूचे आजार (ब्रेन ट्युमर्स लीरळपर् brain tumor दाह इत्यादी) विषाणू व जिवाणूंमुळे होणारे आजार, अशी मेंदूला इजा होणाऱ्यांची यादी मोठी आहे. आपली प्रकृती उत्तम ठेवणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. कोणत्याही कारणाने मेंदूचे काम नीट न झाल्यास स्मरणशक्तीवर मोठाच आघात होणे संभवते.

साचविलेल्या अनुभवाची पुनःपुन्हा पुनरावृत्ती करण्याने हे साठवणे टिकते व पुनरावृत्ती सहज होते. असे केले गेले नाही, तर पुनरावृत्ती कठीण होते. जी गोष्ट आपल्याला आठवणे आवश्‍यक आहे तिचे स्मरण रोज करणेच इष्ट. उदा.- रोज पाढे म्हटले तरच सतरा साते किती हे आठवेल! अभ्यास याचा अर्थच तीच तीच गोष्ट पुनःपुन्हा वाचणे, पुनःपुन्हा आठवणे. समजलेली गोष्ट दीर्घकाळ साचते, न समजता केवळ ऐकलेली गोष्ट लक्षात दीर्घकाळ राहणार नाही, विसरून जाईल. विसरणे हे जरी मेंदूच्या आजाराचे महत्त्वाचे लक्षण असले, तरी दैनंदिन व्यवहारात लक्ष नसणे हेच महत्त्वाचे कारण असते. आपण जे पाहतो आहोत, जे ऐकतो आहोत तेथे लक्ष देणे ही चांगल्या स्मरणशक्तीची गुरुकिल्ली आहे. सकस आहार, नियमाने केलेला व्यायाम, आंतर्बाह्य स्वच्छता, कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाणे, वेळोवेळी अभ्यास आणि पाठांतराची नियमित उजळणी यामुळे स्मरणशक्ती तीव्र राहील

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad